Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

श्री समर्थ मालिक प्रवचन (२) ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन (२) ©️

मनुष्य हा प्राणी श्रेष्ठ मानला जातो. त्याने श्रुति, स्मृती, अनुभव ह्या तिन्हीचा त्रिवेणी संगम आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सत् चित् आनंद एक क्षण का होईना, प्रकृतीच्या दृष्टीने का होईना, लुटण्यास मिळतो.

आपले कर्तव्य कोणते? कोठे गेल्याने परम निधान तत्व प्राप्त होईल? सत् स्वरूप, सत्चिदानंद या दोन्ही स्वरूपाची ओळख कोणत्या ठिकाणीं होईल? हे अजमाविण्यासाठी, याचा अनुभव घेण्यासाठी आणि याच्या प्राप्तीसाठी मायावी पसाऱ्यातून मन काढून घेतले पाहिजे. मायावी बंधने, षड्रिपूंची जाळी तोडली पाहिजेत आणि ती तोडण्यासाठी अविश्रांत धडपड करणे, सद्गुरूंना तन, मन, धनाने शरण जाणे व त्यांच्याच कृपा प्रसादाने आपल्या परम निधान तत्वाचा शोध घेणे, त्यांची जाण घेणे हेच प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे आणि याप्रमाणे प्रयत्न केला नाही तर आपल्या स्वरूपाची ओळख होणे कदापीही शक्य नाही.

सद्गुरु चरणात विलीन झाल्याशिवाय, तेथे लय पावल्या शिवाय सद्गुरूंची ओळख होणे शक्य नाही आणि ज्यावेळी प्राप्त कर्तव्ये निष्कामतेणे करीत करीत सद्गुरु चरणांत लय पावाल, सर्वस्व विसरुन जाल, त्यावेळी सताची ओळख पटेल. परंतु ते सांगता येणार नाही. सर्व त्याठिकाणी लय पावते. असे ते परम निधान तत्व आहे.

या अवतार कार्याप्रमाने मानवांचा उद्धार करण्यासाठी अनेक तत्वे निर्माण केली आहेत व ती आपआपली कर्तव्ये करीत आहेत. (२/५८) ©️

You cannot copy content of this page