Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

श्री समर्थ एकचित्त – भाग एक ©️

श्री समर्थ एकचित्त – भाग एक ©️

सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे मागे पुढे होते. त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते. कोणतीही घडण घडविण्यासाठी काहीतरी निमित्त काढावे लागते. 

एवढेच, असत्याच्या नाशासाठी, सताला थोडी झळ लागते हे सत्य आहे, पण जी घडण घडावयाची ती काही अंशी घडवून घ्यावी लागते. “बोलविता धनी”, त्याचप्रमाणे कृती करून घेणारा फार वेगळा आहे. जी घडण घडली, ती कुणामुळे घडली? ती सत्य आहे. पण या घडणीमुळे खालपासून वरपर्यंत हादरे बसले आहेत. जाणीव झाली आहे. थोड्या कालावधीनंतर काय चमत्कार होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. पुढे सुरु……२ ©️

You cannot copy content of this page