Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री ज्ञानेश्वर माऊली…… प्रवचन (३) ©️

श्री ज्ञानेश्वर माऊली…… प्रवचन (३) ©️

सद्गुरु हेच तत्व, मी कोण आहे, याची जाणीव करून देऊ शकतील. सद्गुरु पद हेच सर्व श्रेष्ठ आहे. याच्या पलीकडे काहीं नाही.

आतापर्यंत जे झाले, ते सद्गुरु माऊलीच्या कृपेनेच झाले. त्या गुरू माऊलीच्या कृपे शिवाय काहीच करता येत नाही. मी काय सांगतो याचे मुळीच भान नाही. बोलविता धनी वेगळाच आहे. कोण बोलतो याची जाणीव रहात नाही. हा दिवस अखंड दर्शनाचा असतो. यामुळे जे काही घडले, ते आपल्या चरणांशी रुजू केले आहे.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी !

तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!

देवाचे द्वार कोणते? देव म्हणजे कोण? याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपण काय करायला पाहिजे ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक मानव प्राणी षड्रिपूच्या जाळ्यात, मायावी तत्वात गुरफटलेला आहे. हे मायावी बंधन तोडून त्या पदाच्या शोधाची धडपड केली पाहिजे. ती धडपड कोणत्या तऱ्हेची असावी? जो आचार विचार, मनाचा व्यापार सद्गुरु चरणांवर अर्पण करतो, तोच देवाच्या द्वारी जावू शकतो. तेथें जाण्यासाठी मार्ग म्हणजे सतभक्ती ! कोठेही जा ! मार्ग वेगळा नाही. फक्त सद्गुरु चरणांचे ध्यान करायचे. त्या चरणापाशी मन पूर्णत्व लीन झाल्यावर, एकाग्र झाल्यावर, त्या द्वारी एक क्षण का होईना उभे राहिल्यावर आपली प्रकृती सद्गुरु चरणी लीन होते व अखंड तत्व प्रगट होते. त्या ठिकाणी लीन झाल्यानंतर कोणत्या मुक्तीचा शोध घ्यायचा?…… पुढे सुरू ©️

You cannot copy content of this page