आजचा आनंदाचा दिवस अन् आनंदी वातावरणात सर्वस्व सेवेकरी, ऋषीमुनी, आनंदात आहेत. १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. १४ वर्षात आजचा हा शेवटचा दिवस म्हटला तरी चालेल. म्हणून आजच्या या शुभदिनी सर्वस्वांना मोकळीकता दिलेली आहे. अजून दर्शन चालू आहे. दुसरी गोष्ट, भारताचा आनंदाचा दिवस थोडक्याच दिवसात चमकणार आहे. भारतातील लोक विचित्र, त्याच्या दुप्पटीने महाराष्ट्रातील आहेत. पण महाराष्ट्रात कर्तव्य झाले म्हणून आपणाला त्याबद्दल आपुलकी आहे. हेच पूर्वीचे दंडकारण्य आहे.
संदेश – शेवटचे शुद्धीकरण संपलेले आहे. आता शुद्धीकरण राहिले आहे ते कोणाचे आणि कोणाचे नाही. आता जडत्वाचे शुद्धीकरण आहे. अनेक तऱ्हेने हे शुद्धीकरण घेतले जाईल. एकच तऱ्हेत घुसळण होईल असे नाही. अनेक तऱ्हेने घुसळण होईल. तदनंतर उ:षापाचा काळ. उ:षापाचा दिवस आल्यानंतर याचे सर्वस्व छेदन करून कशा करिता काय झाले याचे निवेदन त्याच वेळेला होईल. हे जडत्वाचे शुद्धीकरण झाल्यानंतर होईल. हे शुद्धीकरण झाल्याशिवाय नाही.
सुख समाधान केव्हा अन् कधी? अघोरांचा नाश झाल्याशिवाय नाही. फार मोठा काळ नाही. थोडासाच अवधी आहे. १९७७-७८ तद्नंतर महाराष्ट्र भूमी कशी होते ते बघा. तोपर्यंत थोडी का होईना मानवाना अशांती निर्माण होणारच ! पूर्णत्वाने शांती लाभण्यास अजून अवधी आहे. ज्यांनी ज्यांनी हे थैमान घातले आहे, ते थैमान एकाएकी नाश पावणार नाही. नाश करता येणार नाही. त्यांच्याच कर्तव्याच्या अनुसंधनाने त्यांचा नाश केला जाईल. आणखीन जे कर्तव्य होईल ते वेगळ्या तऱ्हेचे होईल. ते सांगण्याची आवश्यकता नाही. एवढेही करून शेवटला मागे मी निवेदन केले आहे. भारतासाठी काही टपलेले आहेत, तेव्हा महायुद्ध होण्याचाही संभव आहे. इतके असूनही ही भारतभूमी शुद्ध ठेवली जाणार आहे. ती वेळ येईल अन् ते करावे लागेल. कारण अघोरांना अधून मधून लहर येत असते पण या भारतातील लोक जरी कमजोर व नेभळट असले तरी भारतात वावरणारे तत्व नेभळट नाही. कमजोर नाही. मला जे करून घ्यावयाचे आहे, ते मी करून घेणारच ! (समाप्त) ©️
