स्थूल जडत्वाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. जडत्वाला व्याप झाले तर मानव कासावीस होतो आणि अशाच वेळेला त्याला परमेश्वराची आठवण होते. जडत्वाच्या पाठीमागे व्याप लागल्यानंतरच मानव देवाचे नाव घेतो. देवाचे ध्यान करतो. अखेर ईश्वरा जवळ शांती मिळविण्यासाठी ओरडतो. पण खरोखर जडत्व जे आहे ते वर्षाचे १२ महिने सुखी असेल का? आणि शांततेत सुरुवाती पासून जडत्व राहील का? सुखी जडत्व राहण्यासाठी अहर्निश ध्यानात, नामात निमग्न राहिले पाहिजे. मग जडत्वाला त्रास होईल का? आणि अशाप्रकारे निमग्न झाला तर त्याला सुख आणि दुःख समान वाटते.
शुभ संदेश – नाम हेच श्रेष्ठ आहे. नामातीत, नामात सद्गुरु आहेत. आपण मानव जन्मात आहात. स्थूलात असेपर्यंत प्रत्यक्ष दर्शन घेणे. कर्तव्याप्रमाणे चालणे. नाम श्रेष्ठ आहे. महान सत्पुरुष नामानेच झाले. जिथे सत नाही असे ठिकाण आहे का? एकच संदेश, मानवात असल्यानंतर काहीना वाटते नामस्मरणास वेळ नाही. पण नामस्मरण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मला केलेच पाहिजे. दोन मिनिटे का होईना मी कर्तव्याचे पालन करीन.
मी-तू, द्वेष भावना न ठेवणे. आपण एकच आहोत जन्माला घालणारा एकच व अंती नेणारा एकच, हि ठाम श्रद्धा ठेवणे. आपण ज्यावेळी शुद्धीकरण घ्याल त्यावेळी प्रथम संदेश विश्व नंतर सर्वस्व कर्तव्य ! ©️
