श्री विठ्ठल – काही लोक मूर्तीच्या दर्शनासाठी लोकांचे सोटके खातात. काही तर पुढे पण येत नाहीत. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जास्त गर्दी असते. धक्का बुक्की होते, मार खावा लागतो. पण विठ्ठल कुठे आहेत, हे कोणी पाहिले आहे का? मग जर हे कळत नाही, मग माळा घालण्यात अन टिळा लावण्यात अर्थ तरी काय आहे? उपयोग काय? जितके माळ घालणारे आहेत, ते एकून एक शुद्ध आहेत कां?
पूर्वी मी जी स्थिती त्या ठिकाणी करीत होतो, ती आपल्या सांगण्यावरून बंद केली. पैसेवाले हौसेने येतात. नादान वृत्तीचे गवसे पण येतात. साध्या भोळ्या भाबड्या स्त्रिया येतात अन या गवशांचे लक्ष त्यांच्या दागिन्यांवर असते. तेव्हा पंढरीची स्थिती अशी आहे. त्या ठिकाणी काहींचे मुडदे देखील पडलेले आहेत. मग मरीला संदेश देऊन ठेवले होते, ते कशासाठी ठेवले होते?
सद्भक्त निष्काम भावनेने माझ्यात रममाण होतो. त्याची फक्त मला डोळे भरून पाहण्याचीच इच्छा असते. मग मी पण त्याच्यापासून दूर जात नाही. पण हे घेईल त्याला. न घेईल त्याला काही नाही. हे काही संतांनी अनुभवले आहे. त्यांनी अभंग रूपाने रचना केली आहे. लिखाण केले आहे. त्याचे इतर लोकांनी ज्ञान घेतले आहे का? घेतले म्हणावे तर पंढरीला येण्याची आवश्यकता काय? ©️
