सद्गुरूंच्या आदेशानुसार जी ज्योत वागेल, त्याचे कोटकल्याण होईल. पण श्रद्धा बलवत्तर असल्याशिवाय एक तत्त्व नाम आपली कधीही गती देणार नाही. म्हणून एकाच तत्वाने, एकच नामाने अनेकांचा उद्धार झालेला आहे. अनेक संतांनी त्याचा उहापोह, त्याचे लिखाण केले आहे, म्हणून ज्याला ज्याची खूण माहिती झाली तरच तो त्यात रममाण होईल. ज्याने हे सर्वस्वाचे निदान ओळखले, तोच ह्यात रममाण होतो. ज्याला याची गती नाही, त्याला याचे काहीच वाटत नाही आणि म्हणून तो फसला जातो. आडमार्गी जातो.
सत भक्तीवर विश्वास नसेल तर तो मोक्ष मुक्तीचा वाटेकरी होणार नाही. जो मायेच्या आधीन बनतो, तो त्याच तत्वाकडे खेचला जातो आणि अशा रीतीने अघोर मायेच्या पूर्ण आधीन बनल्यानंतर खंदकात बुडतो. सत भक्तीने माझी ओळख करून घेणे इतके सोपे आहे, तितकेच ते कठीणही आहे. त्यात जो टिकेल, तो निभावून जाईल, रममाण होईल, तो माझ्यापासून कोठेही जाणार नाही. अशा भक्ताला माझ्यात सामावून घ्यावे लागते. ©️
