Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

बोध – मालिक ©️

बोध – मालिक ©️

श्री समर्थ मालिक – अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्‍हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा करणे, म्हणजे बुद्धीला सत चेतना मिळते, याला म्हणतात बोध !

ज्याने अखंड पदाची माहिती दिली, ते तत्व कोणते आहे, हे सेवेकऱ्यानी अद्याप पर्यंत आपल्या ध्यानात घेतले नाही. मनाला जी कलाटणी मिळते, त्या कलाटणीला बाजू देऊन वाटचाल करणे. मला रंग ना रुप, वास ना गंध, मग आकार कोणीही द्यावयाचा? ज्यांनी खूण दाखविली, त्याचाच आकार द्यावयाचा असतो. करतो कोण? करविता कोण? करून घेणारा कोण? व्यवहार चालतो कशापासून? इतकेच की, मी माझे अंग दाखवत नाही. मायेकडून कार्य करून घेतो.

जो सेवेकरी सत् मार्गाने चालला आहे, तो मात्र शुद्ध अंतःकरणाने लिन होऊन सत् गतीने वाटचाल करतो, तोच ओळखू शकतो. करतात ते मालिक करतात. मी निमित्त आहे असे सेवेकरी म्हणेल, मग मात्र बोधामृत चाखावयास मिळेल. सेवेकऱ्यांनी कर्तव्यात जागृत राहणे, उजाळा करणे. त्याचा उजाळा झाला की, प्रकृतीचा उजाळा होतो. प्रकृती जोपर्यंत अभिन्न होत नाही, तोपर्यंत मन अभिन्न होत नाही. मन जर भिन्न ठेवले, तर सर्वच भिन्न दिसेल. मनाला अभिन्न बनवा हेच संदेश आहेत. ©️

You cannot copy content of this page