Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

पडिले वळण इंद्रिया सकळा – २ ©️

पडिले वळण इंद्रिया सकळा – २ ©️

पडिले वळण इंद्रिया सकळा………..यांनी असे का म्हटले? स्वतःच्या वरून सांगितले की इतरांवरून सांगितले?

त्यांनी तो स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तीत रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाहीत. पाप पुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. म्हणून म्हटले आहे, पडिले वळण इंद्रिया सकळा ! पण ते कधी आणि केव्हा?

ते संत रात्रंदिवस सद्गुरु ध्यानात निमग्न झाले होते. पण प्रकृतीचा तरी अंत लागलेला आहे का? प्रकृतीत कोण वास करतो, हे कोणी पाहिले आहे का?

अघोर भक्तीने जो जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहावयास मिळतात, तो सतापर्यंत येऊ शकत नाही. कारण इंद्रियांना वळण सत पाहिजे. मग वागणूक कशी ठेवली पाहिजे? सत भक्ताचे कर्तव्य कोणते आहे? खेळीमेळीचे वातावरण आहे, तेव्हा निष्कारण वेळ घालविण्यापेक्षा अखंड तिजोरीत रममाण झालात, मग प्रकाश लांब आहे का? तुमची इंद्रिये इकडे तिकडे का बोकाळतात? तुमची इंद्रिये सतात निमग्न झाली नाहीत, असे मी म्हणू का? का अजून बाकी आहेत असे म्हणू? पूर्वीच्या संतांप्रमाणे जर ध्यानधारणा ठेवली, तर प्रकाश लांब आहे का? कोणालाही अप्रकाशित ठेवलेले नाही. पण वाचाळता जास्त असली तर प्रकाश कुठे आणि काय? ते सापडत नाही. (पुढे सुरु….३) ©️

You cannot copy content of this page