Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

कोणीही मरत नाही…©️

कोणीही मरत नाही…©️

श्री संत ज्ञानेश्वर – कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही. नासते म्हणावे तर परत जन्माला कसे येते? हे करतो कोण? एकच सत् ! गुरुमाऊली !! ज्यांना कर्तव्य करून घ्यावयाचे असते, तेच उत्पत्ती स्थिती अन् लय करीत असतात. दुसरे कोणीही नाही. बहुत जन्मांचे सुकृत, त्यांची भरपाई झाल्यानंतर ते आपल्या सानिध्यात घेतात. असे ते मालिक आहेत.

सतपुरुषांना, योग्यांना हे जे आहे, ते सर्व अमरच आहेत असेच म्हटले पाहिजे. वृद्धत्व आल्यानंतर, शरीर जीर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर जडत्वाला ताबडतोब उचलतात. कारण घाण लागेल म्हणून ! म्हणून हा सर्व दृश्य अदृश्याचा खेळ आहे. दुसरे काहीही नाही.

दिव्यदृष्टीने पाहिल्यास कोणाचाही नाश होत नाही. अंगावरील वसन फाटल्यानंतर जसे आपण फेकून देतो, तद्वतच हे सारे आहे. यातच ओळखावे. जे दिसत नाही तेच सेवेकर्‍यांनी पाहण्याचा प्रयत्न करावा. ते सद्गुरू शिवाय कोणीही दाखविणार नाही. तेच पांडुरंग ! तेच सर्वस्व !! अनंत रूपाने, अनंत नामाने ते नटलेले आहेत. म्हणून कोणत्या रूपाने त्यांना पहावे? हाक मारावी? ज्या नावाने हाक मारावयाची, ते नाम सेवेकऱ्यांना माहित आहे. ©️

You cannot copy content of this page