कलियुगाचा मध्य उलटला आहे. स्फोट होणारच आणि त्याप्रमाणे दिसण्यात येईल. गती घेण्याचा काळ अगदी समीप आला आहे. ज्या वेळेला कर्तव्य परायणता होईल, त्यावेळेला पूर्णत्वाने संदेश मिळतील. दिले जातील. चिंता करावयाची नाही. सत्य म्हटले तर, हे कलियुग आहे. सत आहे हे. ते सत् तरी कशावरून? स्थिती गती नुसार ह्याची कल्पना येतेच आहे.
कोकणात स्थापित झालेले आसन हे चमत्काराने नटलेले आसन आहे. हे सत्य समजा. दंडकारण्यात सर्वत्र अघोरी तत्वे विखुरली होती. एक, दोन, तीन शुद्धीकरणे घेतली तरी ती भूमी अजून शुद्ध झालेली नाही. अशीच पुढे शुद्धीकरणे होत होत ती पूर्णत्वाने शुद्ध होईल. ती शुद्ध आणि पवित्रच आहे. चमत्कार त्या ठिकाणी होतील. परंतु थोडासा अवधी आहे. आपण मला टोचत होतात की अखंड चमत्कार हे कोणते चमत्कार? अखंड चमत्कार हे अखंडच असतील. त्यांना कधीही खंडत्व नाही.
सताला नेहमीच त्रास होतो. त्यावेळेला नाराजी होते. कर्तव्य करताना जो आनंद मिळतो, तो फार निराळा असतो. कर्तव्य केल्यानंतर जी ठेवण मिळते ती अखंड असते. सातारला पण मानवी गतीप्रमाणे त्रास झाला, पण आसन त्याच ठिकाणी आहे. मानव जरी सत् तत्त्वाचा अंश असला तरी कालचक्रात जर सापडला तर तो सतापासून वेगळा राहतो, मग पळून जातो कोण? त्रास होतो हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी मानवी गतीप्रमाणे भक्तीयुक्त वातावरण निर्माण झाले पण केव्हा? सत् हे अखंड पाठीशी आहेत हे समजल्यानंतरच ना? पण त्रास देणाऱ्याची कोणती गती झाली? पळून गेला कोण? आता त्या ठिकाणी मानाने, डौलाने त्या आसनाजवळ मिरवता आहेत कोण? जरी चमत्कार मागितले नाहीत, तरी पण कोकणातील माणसे ही दैविक आहेत, भाविक आहेत. राजमार्ग त्यांना सापडला आहे, तो ते मार्गक्रमण करीत करीत सताप्रत येण्याचा प्रयत्न करतील आणि येतील. ©️
