संतांनी स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तित रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाही. पापपुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. ते संत, रात्रंदिवस सद्गुरु ध्यानात निमग्न झाले होते. पण प्रकृतीचा तरी अंत लागलेला आहे का? प्रकृतीत कोण वास करतो, हे कोणी पाहिले आहे का? अघोर मानव अघोर भक्तिने जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहायला…
इंद्रियांना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियाचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले? पडीले वळण इंद्रिया सकळा ! त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्यांची इंद्रियें सद्गुरुमय झालेली होती. त्याचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले…
पूर्वीच्या युगात महान महान सेवेकरी होते. ते अखंड सेवेत, गतीत निमग्न झाले, सेवामय झाले, भक्तीमय झाले. त्याप्रमाणे आताच्या युगात कोणी दिसत नाही. आहे कोणी असा की ज्याची तिजोरी भरून वाहत चालली आहे. अखंड असे सत्पुरुष आहेत का? पण ते ऋद्धी सिद्धीच्या पाठीमागे आहेत. ते मानवांना चमत्कार दाखविण्यासाठी, नावाला हपापलेले असतात. भक्तीला असे काही एक लागत…
श्री समर्थ मालिक - अखंड सेवा ही दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे.
अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड…
- श्री समर्थ मालिक प्रवचन - सद्गुरु ! सद्गुरु ! सद्गुरु म्हणजे तरी काय? अन् हे कसे आहेत? सत् आणि गुरु ! सत् सोडून गुरु ही दोन अक्षरे आहेत. सताला आकार नाही, गुरुला आकार आहे. पुढे संस्कृत श्लोकच आहे -
गुकारो प्रथमो वर्णा, मायादी गुण भासका | सकारम् द्वितीय ब्रह्मा | माया भ्रांती…
श्री एकनाथ महाराज - आम्ही, माझ्या समर्थांच्या कृपेने त्यांच्या चरणात लीन होतो म्हणूनच गती मिळते. तेच सर्वस्वाचे निधान आहेत. मी, माझे समर्थ जनार्दन स्वामी, त्यांना मी सर्वस्व वाहिले होते. त्याप्रमाणे आमची ठेवण होती. मग दुसरीकडे भटकण्याची आवश्यकता काय?
ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून,
ॐ कार बीज मात्रेण | नित्यम्…
श्री एकनाथ महाराज - सद्गुरूंचा महिमा जाणा. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे, हा एक त्यांच्या चरणांचा कण आहे, मग सद्गुरु महिमेचा अंत त्याला सापडेल का? त्यांच्या लिलेचाच जर अंत सापडला नाही, तर त्यांचा अंत सापडणे दुरापास्त आहे. अनंत कोणी टोपी आहे ती ! मग त्यांच्या महिमेचा अंत लागेल का?…
श्री समर्थ मालिक - सर्वांच्या हृदयी सत आहे. परमेश्वर सर्व व्यापक आहे. पण तो कोणत्या गतीने, त्याचे वर्णन काय? मानवाने पाहिले म्हणावे, तर तो मार्ग विसरतो कां?
प्रकृती आहे. ही प्रकृती किती तऱ्हेने नटलेली आहे? सेवेकऱ्याने प्रकृतीचा तरी अंत घेतला आहे का? प्रकृतीला जर अंत नाही, मग अंत लावू शकता का? प्रकृतीला भ्रांती…
आकार हा तत्त्वाच्या रहित आहे का? मग तत्त्वाने आकार पोसला गेला की आकाराने तत्व पोसले? मग आपणाला काय पाहिजे? तत्व पाहिजे का? यामुळेच सेवेकरी फसला जातो.
सत् हे आकारी आहे अन् आकारा रहित पण आहे. जर आपणाला त्रिगुण रहित पाहिजे असेल तर त्याप्रमाणे वाटचाल करणे. माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे…
श्री राम नवमी – माझा आजचा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यसाठी जन्म अवतार नटवलेले तत्त्व तो मीच आहे. मला जी कर्तव्य सांगितली, ती करीत करीत मी लयबद्ध झालो होतो. सताला पूर्णत्वाने संरक्षण देणे व असताचा नि:पात करणे, हीच भूमिका घेऊन सर्वस्वाला सांभाळीत ज्याच्यासाठी जन्म अवतार नटवला…
श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला, मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते ही मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे, अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले.
हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर म्हणजे वेगळे तत्व आहे असे म्हणणारे मानव…
काही सेवेकर्यांनी किती कर्तव्य बजावले आहे? तर शून्य ! कर्तव्याची वाटचाल थोडी पण बडबड जास्त असते, म्हणून सेवेकऱ्यांनी जर शंका आणल्या तर त्या सद्गुरूंना माहीत असतात. जे काही करतो ते सर्व सद्गुरु जाणतात. थोडासा त्रास सहन केला पाहिजे, म्हणून त्या संतांनी असे म्हटले आहे. पूर्वीच्या संताप्रमाणे कृती करा अन् चौकटीत बसा.
सेवेकरी कसाही असो,…