श्री समर्थ मालिक - सेवेकर्यांनी सत् तत्त्वाप्रमाणे चालले पाहिजे. याप्रमाणे सेवेकरी होऊ लागला तर त्या ठिकाणी लाघवीचे काही चालत नाही. मीच थोडीशी पाहणी करतो. सेवेकरी तत्त्वाच्या ठिकाणी ठाम झाले तर मला काही करता येत नाही.
मी आकारी आहे अन निराकारी पण आहे, पण एकच म्हणावयाचे, जे आकाराकडून संदेश मिळतात, सांगणे होते त्याची जोपासना सेवेकर्यांनी…
श्री समर्थ मालिक - अनेक वेळेला अनेक प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते हे फार श्रेष्ठ नाते आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा या नात्याची ओळख होऊ शकते, पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही, त्यांना त्याची जाण नाही. गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा आणि पहा किती फरक पडतो? याचा सेवेकर्यांनी विचार करावा.
हे नाते…
श्री समर्थ मालिक –
मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात, मग सेवेकरी अभिन्न का होत नाही? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये? ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला आहे असे म्हणता येईल कां? त्यांने सताचे बोल ऐकले नाहीत…
श्री समर्थ मालिक –
महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या आहेत हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी करतो काय अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार…
श्री समर्थ मालिक - प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी त्या पात्रतेला अजून गेलेले नाहीत. लाघव करण्याचे कर्तव्य मी मायेकडून करून घेतो.
मी करूनही अकर्ता, सुखदुःखाच्या वेगळा आहे, वेगळा असून सुद्धा पाप पुण्याच्या निराळा आहे. सर्व व्यापक असूनही अलिप्त आहे. पण सेवेकरी…
श्री समर्थ मालिक - आकारीले तितुके नासे | एरवी तत्त्व असे ते अविनाशी ||
आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो. म्हणजे आकार दृष्य झाला असे वाटते, कोणाला अन् नाही कोणाला? स्थानवंत आहे त्या अर्थी आकारी आहे. आकारी असून निराकारी आहे त्याचा ठावठिकाणा नाही.
आत्तापर्यंत प्रवचने होत…
श्री समर्थ मालिक - एका सेवेकऱ्याचे पत्राद्वारे संदेश काय येतात, त्याला तुम्ही हसता हे बरोबर दिसते का? एखाद्याला वाईट वाटेल असे बोलता, कधी कुणी चेष्टा-मस्करी करतात, कधी कधी कुणी पायरी सोडून वागतात हे कितपत योग्य आहे? ह्याचा विचार करा.
आसन जागे नाही झोपले आहे असे आपण समजता का? हा दरबार हसण्याचा आहे का? हसत होता…
श्री समर्थ मालिक - भक्ती ही साधी, सोपी अन् सुलभ आहे, पण त्या भक्तीची लाज राखणे दुरापास्त आहे. भक्तीला तेज आणणे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे, पण ते त्यांच्या हातून होत नाही म्हणून सेवेकरी फसतो. वाट चुकल्यानंतर त्याला ठेचा लागतात. मग त्यात दोष कोणाचा आहे?
दरबारात आपण विचारणा केली होती,“प्रेमसूत्र नेतो तिकडे जातो श्री हरी”, मग…
श्री समर्थ मालिक – सेवेकऱी प्रवचन ऐकतात, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालतात का? आदेश मानतात का? मनात रुजू करून घेतात का? सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही. तुम्हाला सांगून ते करून घेईल का? तर नाही. सेवेकऱ्यांच्या मनात शंका कुशंका का येतात?
या दरबारात काय चालते हे मी पूर्णत्वाने जाणतो. सेवेकर्यांची…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी दिलेल्या ज्ञानात तल्लीन असतात काय? ज्ञान बहाल केलेले आहे. त्याचा उजाळा करू लागला तर वेळ प्रसंग येथील तेव्हा स्वतः सेवेकरी सत कृतिमान होऊन दूर हटवू शकेल. सेवेकरी हा शंकेत आहे कि शंकेच्या रहित आहे? म्हणजे अजून त्यांनी सद्गुरु व सत ओळखले असे म्हणावे की नाही? तुमच्या मायेसाठी, सुखदुःखांसाठी सत् आहे,…
श्री समर्थ मालिक - मानव स्वतःच्याच कृतीने भटकला जातो. भक्ती कोणत्या तऱ्हेने व कशी करावी? जो सेवेकरी ज्ञानाची अपेक्षा करतो मग विषय कोणताही असो, तो सेवेकरी समजतो व मानतो. बोल सहज सुटत असतात. ते सहज बोल असतात. त्याप्रमाणे आपली वर्तणूक राहिली आहे काय? आपण ती राखली आहे काय? का नाही राखली? ती कोणी राखावयाची? …
श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे ज्ञान दिलेले आहे, ते त्यांनी जतन करून ठेवले आहे कां? सर्व सेवेकऱ्यांना विचारणे आहे, व्यक्तिशः कोणालाही नाही. सेवेकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये.
ज्ञान जतन करून त्याची जपणूक राखली आहे का तर ते…