श्री समर्थ मालिक – या आसनाच्या सेवेकऱ्यांना अनेक वेळेला टोचणी दिलेली आहे. सर्व सेवेकऱ्यांची मनोभावना शुद्ध आहे का?
आसन आदीअंता पासून आहे. आसनाधिस्त आदीअंता पासून आहेत. काही गुप्त गोष्टी गुप्त असतात. सत् त्या गोष्टी गुप्त ठेवतात. अर्जुनाला देखील सांगितले होते, “सत् असताचा वादविवाद चाललेला आहे.” याच्यासाठी कोणत्याही सेवेकऱ्यांनी, “बस, गती घे ! मला सांग” असे सांगने योग्य आहे का? जरी सेवेकर्याला सांगितले, तरी सांगून काय उपयोग आहे? अजून शुद्ध व्हा ! शुद्ध गतीने जा ! मनाची शुद्धता ठेवा ! “बस, गती घे आणि काय आहे ते सांग” हे म्हणने योग्य नाही.
भक्ती जितकी साधी, तितकीच कठीण आहे. म्हणून सोप्या सुलभ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. साधी सोपी म्हणजे सरळ शुद्ध मार्गाने गेलात तर कठीण नाही.
गुरुबंधूंचे नाते कोवळे का? गुलाबाचे फुल कोवळे नाजूक असते, तसे सेवेकर्यांनी आपले मन का ठेवू नये? सताला अतिशय त्रास झाला. सतावर असताने कुरघोडी केली म्हणजे अवतार कार्य घ्यावे लागते. तद्वतच आता काय चालले आहे, काय होत आहे याचा अनुभव सेवेकऱ्यांना मिळाला की नाही? म्हणून हे समजून आपण आपल्या कर्तव्यात निमग्न का होऊ नये? ©️
