सताच्या संदेशाप्रमाणे आम्ही कर्तव्य परायणता साधतो. त्याच्या शिवाय कर्तव्य होत नाही. म्हणून जगात सत आहे. रामावतारात माझ्याकडून कर्तव्य करून घेतले. त्याचप्रमाणे कृष्णावतारातही माझ्याकडून कर्तव्य करून घेतले. पुढेही ते नामा निराळे राहून कर्तव्य करून घेणार अन् आत्ताही घेत आहेत. आम्ही निमित्त मात्र आहोत. तेव्हा या भारत भूमीच्या रक्षणार्थ सर्वस्वाचे निधान आपण होऊन अवतार नटवले. अशी ही…
श्री राम नवमी – माझा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यासाठी जन्म अवतार नटवलेले तत्त्व ते मीच आहे. मला जी कर्तव्य सांगितली, ती करीत करीत मी लयबद्ध झालो होतो. सताला पूर्णत्वाने संरक्षण देणे व असताचा नि:पात करणे, हिच भूमिका घेऊन सर्वस्वाला सांभाळीत, ज्याच्यासाठी जन्म अवतार नटवला त्यांचा…
श्री सद्बागुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल, तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने तुम्ही शुद्ध ऐकाल, तुम्हाला शुद्धच ऐकू येईल. वृत्ती हीन असेल तर त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. शुद्ध विचार आले नाहीत तर आपल्यात शुध्दत्वता येणार नाही. शुध्दत्वता आली…
सद्गूरु म्हणजे काय? मालिक हे तत्व फार वेगळे आहे. त्याला आदी नाही, मध्य नाही आणि शेवटपण नाही. रूप नाही, रंग नाही. आकार, विकार कांहीं एक नाही. त्यांचे वर्णन, स्थिती, गती कांही एक सांगता येणार नाही. केवळ आपल्या भक्तांचे कोडकौतुक पुरविण्यासाठी चैतन्यमय बालस्वरुप प्रगट करतात. खरे रूप पाहण्यास गेल्यास पाहता पाहता त्याच ठिकाणी लय होतात. सांगता…
श्री राम नवमी – माझा आजचा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यसाठी जन्म अवतार नटवलेले तत्त्व (जो क्षिराब्धी तो) मीच आहे. मला जी कर्तव्य सांगितली, ती करीत करीत मी लयबद्ध झालो होतो. सताला पूर्णत्वाने संरक्षण देणे व असताचा नि:पात करणे, हिच भूमिका घेऊन सर्वस्वाला सांभाळीत ज्याच्यासाठी जन्म…
या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते.
आसनाला मानवाची मानवता सिद्ध करायची आहे. तो काळ समीप आला आहे. ज्याला आपण मानव आहोत याची ओळख पटेल, तोच खरा मानव !
आपणास शुभदिनी संदेश दिलेले आहेत. फार मोठे संघर्षण होणार…
अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात निमग्न असताना सुद्धा, त्यांना आपल्या कर्तव्यात निमग्न होऊ न देता, अघोर त्यांच्या कर्तव्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेला अवतार कार्य नटवावे लागते.
आत्ता असेच अवतार कार्य चालू आहे. याच शुभदिनी अवतार…
संदेश
हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व तो कितपत आहे हे सांगता येणार नाही. ज्यावेळेला चत्वार खाणींची निर्मिती झाली, त्यात मानव हा श्रेष्ठ प्रतीचा आहे. त्याच्याकडे एकच तत्व देऊन ठेवले आहे, ते म्हणजे सरस्वती ! त्याचा त्याला उपयोग करता येत…
समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, एका तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक मिनीष सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.
शरीर हे जडत्व आहे.…
कासयासी ऐसा माझे माथा ठेवा | भार तुम्ही देवा संतजन |
विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण ||
काय वानराचे अंगी ते शक्ती | उदका तरती वरती शिळा ||
तुका म्हणे करी निमित्यची आड | चेष्टाऊणी जड दावी पुढे ||
प्रथम त्याला कृती करताना काही वाटत नाही. स्थुलात, जड देहात होता,…
विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण || ज्या मानवाचे विचित्र विधान आहे, म्हणजे पूर्वीचे संचित विचित्र आहे, त्यांचे पूर्वीचे ऋण म्हणून सानिध्यात घेतले जाते. म्हणजे तो कासावीस झालेला असतो. विचित्र भोगत्वाचा त्रास होतो. संत संगतीने त्याचा थोडा थोडा क्षय होत असतो. विचित्र विधानाचे अनुसंधनाने काय करतात? ते संचित त्याला अनुसरून नाना खेळ…
धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? मग कृतीमान कधी होणार? मी शेषावर पहुडलो आहे. शेषावर पहुडलेले तत्त्व जर झोपलेले असते, तर मग मी अह:र्निश झोपलेलो असतो, नाही का? तर नाही. मला नाही झोप, नाही जागरण ! रात्र नाही, दिवस नाही ! आकार नाही, विकार नाही ! मग मला कसे ओळखाल?
सेवेकरी आपल्या कर्तव्यात जागृत…