श्री समर्थ मालिक – “सगुनाचा सार घेणे यातच सर्वस्व आहे.”
संसारात राहूनच कोणाचे कृपेने हे चालले आहे, कुणाच्या कृपेने हे करतो आहे, हे ज्याला समजले, ज्याने जाणले तो कुठेही भिक्षा मागावयास जाणार नाही, पण अशी कृती होणे कठीण आहे. हे सर्वस्व समर्थांचे आहे, त्यांच्याच कृपेने मी कर्तव्य परायण आहे, कर्तव्य करतो आहे, अशी ज्याची ठेवण असते, त्यांच्याच ठिकाणी मग यश त्याचे आधीन असते. मग एकाच्या सख्यत्वासाठी प्राण अर्पण केला की न केला, हे सेवेकऱ्यांने ओळखावे.
असे ते तत्व कोणते आहे? एकाच्या सख्यत्वासाठी मी काही नाही केले, पण त्यांच्यात भक्ती असून, तो मायावीत असला तरी तो माझा आहे. पण शेवटी तो काय घेऊन जातो? अन् कोणाचे कोणाला वाहतो? हे त्याला कळत नाही. याचा निर्माता कोण? प्रेम निर्माण कोण करतो? भाव निर्माण करणारे, चेतना निर्माण करणारे अशी काही तत्वे आहेत. पण ठाम निश्चय करणारा तरी कोण? मनाची चलबिचल करणारा कोण? म्हणून एकाच ठिकाणी तरी ठेवणारा कोण?
सर्वस्वी संपत्ती जरी मला अर्पण केली, तरी मला संपत्तीचे काय करावयाचे? मी तर निष्कामच आहे. मला संपत्तीची आवश्यकता काय? इतके समजावे, आम्ही जे करतो, धरतो, संपत्ती जमवितो ते कोणाचे सत्तेने करतो? हे त्याने समजावे व त्याप्रमाणे वाटचाल करावी. आणखी काय सांगावे? यात रामदासांचे काय चुकले? त्यांनी काव्यरचना केली ती बरोबर आहे. (समाप्त) ©️
