Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

कलियुगात चैतन्य हेच अस्त्र…©️

कलियुगात चैतन्य हेच अस्त्र…©️

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला किती अडचणी निर्माण झाल्या, आहे ना कल्पना?(आहे.) म्हणूनच या कलियुगी स्थितीत पूर्णत्व उघड केले नाही. या कलियुगी स्थितीतच आपणास कर्तव्य करावयाचे आहे. २५ अवतार कार्याची मानवांना कल्पना असेल, सताने कसे कर्तव्य केले ते!

या २६ व्या अवतार कार्यात सत कसे कर्तव्य करीत आहे? सता प्रत्येक अवतार कार्यात कोणाची ना कोणाची मदत असे. पण या अवतार कार्यात एकच “चैतन्य” कर्तव्य करीत आहे. सता द्वापार युगात बाण हेच अस्त्र होते अन या कलियुगात चैतन्य हेच आपले अस्त्र आहे.

सता द्वापार युगात ज्याप्रमाणे बाण हे अस्त्र कर्तव्य करीत होते त्याप्रमाणे कलियुगात चैतन्य हे अस्त्र कर्तव्य करीत आहे. सता प्रत्येक अवतार कार्यात, या कलियुगी मानवी स्थितीत, मानवी स्थितीत आपली निर्मिती झाली आहे, पण या मानवांना कल्पना आहे का? तर नाही. सता आपण मानवी स्थितीप्रमाणे कर्तव्य करीत आहात. पण कलियुगी मानवी स्थिती पहात आहे.©️

You cannot copy content of this page