Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

महामुनी कार्तिक – सद्गूरु म्हणजे काय? ©

महामुनी कार्तिक – सद्गूरु म्हणजे काय? ©

सद्गूरु म्हणजे काय? मालिक हे तत्व फार वेगळे आहे. त्याला आदी नाही, मध्य नाही आणि शेवटपण नाही. रूप नाही, रंग नाही. आकार, विकार कांहीं एक नाही. त्यांचे वर्णन, स्थिती, गती कांही एक सांगता येणार नाही. केवळ आपल्या भक्तांचे कोडकौतुक पुरविण्यासाठी चैतन्यमय बालस्वरुप प्रगट करतात. खरे रूप पाहण्यास गेल्यास पाहता पाहता त्याच ठिकाणी लय होतात. सांगता येत नाही. असे ते मालिक आणि सद्गुरू एकच आहेत.
कार्यासाठी निरनिराळे अवतार धारण केलेले आहेत.

अवतार कार्ये जरी निरनिराळी असली, तरी देव एकच आहे. ईश्वर एकच आहे. जरी त्यांनी अनेक रूपे धारण केलीत, तरी ती सर्व एकाच ठिकाणी लय होतात. त्यांचे विवरण मी अज्ञान बालक काय करु शकणार आहे?
जे पाहिले, प्रत्यक्षात अनुभव घेतात, तेच विवरण करीत आहेत. अशा त्या मालकांच्या ठिकाणी कोणतीही चूक लपून राहणे शक्य नाही. सर्वांच्या अंत:र्यामी सर्व ठिकाणी व्याप्त असून सुद्धा ते नामानिराळे आहेत. त्यांना सर्वस्वाची माहिती असते. सर्व गोष्टी त्यांच्या ध्यानात असतात.

त्रिभुवनातील प्रत्येक वस्तूत मालिक परिपूर्ण भरलेले आहेत. मालिक नसतील तर त्यांत चेतना निर्माण होणार नाही. त्रिभुवनातील एकही पान त्यांच्या सत्तेशिवाय हलत नाही. ते एकाच ठिकाणी स्थीर होऊन त्रिभुवनाचा कारभार हाकतात. सर्व सुत्रांची दोरी त्यांच्याच हातात आहे.
खरे रूप पाहण्यास गेले, ते त्याच ठिकाणी लय झाले. सद्गुरू हा बोल फारच अमोलीक आहे. ते पूर्णत्वाने विचार करुनच बोल बाहेर फेकत असतात. (समाप्त) ©

You cannot copy content of this page