Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

कर्तव्य कसे होते, कोण करते….©️

कर्तव्य कसे होते, कोण करते….©️

कासयासी ऐसा माझे माथा ठेवा | भार तुम्ही देवा संतजन |

विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण ||

काय वानराचे अंगी ते शक्ती | उदका तरती वरती शिळा ||

तुका म्हणे करी निमित्यची आड | चेष्टाऊणी जड दावी पुढे ||

प्रथम त्याला कृती करताना काही वाटत नाही. स्थुलात, जड देहात होता, त्या वेळेला सताला त्रास दिला, म्हणजे नाशाला कारणीभूत ज्याचा तोच होतो. त्यापेक्षा तुम्ही एकाच मार्गाने जाल, तर तुमचा तुम्हीच मोक्ष मिळवू शकता. ईश्वरा समान बनू शकता. नाही पेक्षा मन मानेल, मन डोलेल, त्याप्रमाणे डोलू लागलात, तर मात्र फार कठीण आहे, मग विधान कसे होते, तर अशुद्ध होते. नंतर त्या कृतीमुळे संचित वाढते. आपोआप टोले बसतात. मग सताना तो विनवणी करतो.

दृढ विश्वास व एकच तत्व असल्यामुळे शिळा तरल्या गेल्या. होते ते चांगल्या करिता होते. मानवाकडून कृती करून घ्यावयाची असली, तर वाटेल ते करून घेतात. मानव म्हणतो, मी करतो. मी केले हे सत्य आहे की नाही? वानर सैन्य हाताशी असताना, हे कार्य करण्याची आवश्यकता काय? हा मुद्दा बाजूला ठेवा. पण विचित्र विधानाचा क्षय होऊन शुद्ध विधान कसे वाढेल? याच मार्गाने जाणे. जे घडते, ते काहीतरी निमित्त करून करावे लागते. मात्र कर्तव्य कसे होते, कोण करते याची जाणीव मिळणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page