Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

पांडवांचाच पाठीराखा का झालो? ©️

पांडवांचाच पाठीराखा का झालो? ©️

भक्तीत रममाण होणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. जे भोगत्व आहे, ते कोणासही सुटलेले नाही. भोगत्व नसेल तर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतो. फक्त कस घ्यावयाचा असेल, तर तो मीच घेऊ शकतो, इतर कोणीही नाही.

देही जर पंढरी बनली, तर तो बाकी उरला आहे असे होईल का? तर नाही. असा जर तो भक्त झाला, तर माझे लक्ष त्या भक्ताकडे असणारच ! पण, असा होण्याचा सेवेकऱ्याने प्रयत्न केला तर !

आपणाला किती वेळा सांगितले, “कर्तव्य सोडू नका.” भक्ती साधी, सोपी, तितकीच कठीणही आहे. त्यातून निभावून जाणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. माझ्या भक्ताची थोडीशी चाचपणी केली तर त्याला वाटते, आम्ही आपले सेवेकरी मग असे का?

बोलणे सोपे, तशी कृती सोपी आहे का? माझे लक्ष आहे की नाही, याची तुम्हास जाणीव राहणार नाही. पण इतकेच आहे, असूनही नाही. मग मी असूनही नाही असे का? पांडवांशीच मी सहकार्य केले, मग कौरवांचे हृदयी मी नव्हतो का? मग पांडवांचाच पाठीराखा का झालो? हे लक्षात घ्या. ©️

You cannot copy content of this page