Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री विठ्ठल प्रवचन ©️

श्री विठ्ठल प्रवचन ©️

श्री विठ्ठल – सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्य प्रविण असतो.

सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा.

विठ्ठल हे एक आकारी तत्त्व आहे. आदेशाप्रमाणे त्यांनी फेकलेले आहे. ते कशासाठी? मानवांना भक्तीचे वळण लागावे, त्यांनी सत मार्गाने जावे याच हेतूने आम्हाला येथे पाठविले आहे. सत् भक्तांची अतिशय तळमळ असते, त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने दर्शन द्यावे लागते. भक्तांना बोल गेले, ती वेळ निघून गेली आहे. म्हणून परम निधान एकच सत् आहे. या पलीकडे दुसरे कोणीही नाही. मात्र जो पारखी आहे, त्यालाच हे कळेल. इतरांना काही कळणार नाही. (पुढे सुरु…२) ©️

You cannot copy content of this page