श्री गुरुदेव पितामह म्हणतात, “ॐ या प्रणवातच सर्वस्व स्थिती बहरलेली आहे.“
सताने दिधलेले प्रणव मानवाच्या लक्षात रहात नाहीत. आकलन येणे सताने आपणांस आपणाप्रत घेऊन ठेवले आहे. जर सताने तुम्हास आपणाप्रत घेऊन ठेवले नसते, तर तुम्ही स्थिर राहू शकणार नाही. सताने आपली जी स्थिती आहे, ती आपणाप्रत ठेवली आहे. ज्या अवधीत सताने आपल्या शिरकमलावर हस्तस्पर्श केला, त्या अवधीत सताने तुम्हास आपणाप्रत घेतले आहे.
*ॐ स्थितीवर प्रणवावरच सर्वस्व स्थिती बहरलेली आहे.*
शारीरीक स्थितीत जी इंद्रिय स्थिती आहे, त्यामध्ये आद्य इंद्रिय – तुमचे शिरकमल आहे. तुम्हास शिरकमल नसेल तर इतरत्र शारीरीक स्थितीचा तुम्हास काही उपयोग नाही. त्या शिरकमलातच सर्वस्व बहरलेले आहे. आपणास शिरकमल नसेल तर तुमचे हात काही करु शकणार नाहीत, पाय काही करु शकणार नाहीत, हृदय काही करु शकणार नाही. शिरकमल असते तेंव्हाच सर्वस्व स्थिती कर्तव्य करु शकते.
त्या शिरकमलात ॐ प्रवेश करुन आहे म्हणून आपण आहात. आपुले मुख आहे, डोळे आहेत, कान आहेत अन् लक्षात रहाण्यासाठी मेंदू आहे. हा मेंदूच तुमच्या सर्वस्व शरीराला चालना देत असतो. परंतु निर्गुण निराकार आपणास आकार देते, ते जर तुमच्यात प्रवेश करुन नसेल तर तुम्ही कर्तव्य करु शकणार नाही. ॐ कारांची स्थिती तुमच्यात राहील तरच सर्वस्व स्थिती तुमच्या स्थितीत राहील अन् त्याचवेळी तु़म्ही कर्तव्य करु शकणार. ॐ कारांची स्थिती सताने कर्तव्यासाठीच केली आहे. (पुढे सुरु…३) ©️