Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

नाम म्हणजे भक्ती ©️

नाम म्हणजे भक्ती ©️

श्री समर्थ मालिक – मानव धर्म श्रेष्ठ आहे. या ठिकाणी नाम सर्वस्व आहे. सहज साधारण नाम म्हणजे भक्ती ! नाम कोणत्या तऱ्हेने झाले यावर लक्ष देणे. नामासारखी गोडी नाही. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही. आपले जीवन कोणत्या तऱ्हेने जात आहे, हे फक्त अखंड नामाने लक्षात येते आणि म्हणूनच मुख्य नाम निर्माण झाले.

नाम मनुष्य जीवन तारण्यासाठी आहे. नाम ही वस्तु नाही, आकार, रूप, रंग काही नाही. आपण जसे पाहू तसे दाखविले जाते. ज्या इच्छेने घेऊ, ती इच्छा पुरी करते.

नाम हे बीजारोपण आहे. शुद्ध भूमी सात्विक झाल्यानंतर त्याच ठिकाणी असणारे नाम हे बीज आहे.

नाम हे अनेक तऱ्हेचे, अनेक मार्गात घेतले जाते. ज्यात मनुष्याचा उद्धार होतो, ते नाम सहसा लवकर मिळत नाही. नामाची गोडी लागल्यानंतर, ते सुटत नाही. असे ते नाम कोणते? त्याची गती काय? ते नाम कोठे आहे? याची ओळख आपणाला सद्गुरु करून देतात. ज्या ठिकाणी ते प्रगट झाले, ते चराचर, परात्पर, क्षरात्क्षर असे सर्वस्व व्यापून देखील अलिप्त आहे. (पुढे सुरु…२) ©️

You cannot copy content of this page