श्री सद्गुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने ही शुद्ध ऐकाल. वृत्ती हीन असेल त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.
“सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. मन सूक्ष्माला सोडून नाही.”
मनाला शुद्ध ठेवायचे असेल तर प्रथम पायरी वृत्ती शुद्ध ठेवली पाहिजे. वृत्ती शुद्ध असेल तरच त्रिकुटी स्थिर राहील. कितीही उच्च पदाची ज्योत असली, पण जर त्याची वृत्ती हीन असेल तर त्याच्याकडून काहीही होणार नाही. ज्याची वृत्ती सत शुद्ध आहे, त्याला जगात कोणीही बनविणार नाही. वृत्ती जर शुद्ध नसेल तर मन केव्हाही स्थिर राहणार नाही. मन स्थिर राहिले नाही, तर कधीही सद्गुरू प्राप्त होणार नाहीत. (समाप्त) ©️
