Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

मन शुद्ध ठेवणे ©️

मन शुद्ध ठेवणे ©️

श्री सद्गुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने ही शुद्ध ऐकाल. वृत्ती हीन असेल त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.

“सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. मन सूक्ष्माला सोडून नाही.”

मनाला शुद्ध ठेवायचे असेल तर प्रथम पायरी वृत्ती शुद्ध ठेवली पाहिजे. वृत्ती शुद्ध असेल तरच त्रिकुटी स्थिर राहील. कितीही उच्च पदाची ज्योत असली, पण जर त्याची वृत्ती हीन असेल तर त्याच्याकडून काहीही होणार नाही. ज्याची वृत्ती सत शुद्ध आहे, त्याला जगात कोणीही बनविणार नाही. वृत्ती जर शुद्ध नसेल तर मन केव्हाही स्थिर राहणार नाही. मन स्थिर राहिले नाही, तर कधीही सद्गुरू प्राप्त होणार नाहीत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page