Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नामाचा महिमा ©️

नामाचा महिमा ©️

श्री संत तुकाराम महाराज – मी महान नाही. मी कोणत्या गतीने महान आहे. गती देणारा घेणारा फार वेगळा आहे. तो पांडुरंग फार वेगळा आहे. त्यांचा कोणीही अंत लावलेला नाही अगर लावू शकणार नाहीत. माझ्यासारख्या पामराला महान म्हणणे बरोबर नाही. जे महान आहे तेच ते पांडुरंग फार निराळे आहेत. प्रणव देणारे अन घेणारे तेच आहेत. बोलविता धनी फार वेगळा आहे. आपल्याच कृपेने अमृतमय अभंगवाणी प्रसवली आहे.

नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची।।

नाम ! दोनच अक्षरे पण त्यात सर्व ब्रम्हांड भरलेले आहे. हे नाम किती साधे किती सोपे आहे, गोड आहे, अमृततुल्य आहे. ते घेण्यासाठी मनाची सतशुद्ध ठेवण पाहिजे, मग काहीही अवघड नाही. यासाठी वनात, गिरीकंदरी जाण्याची आवश्यकता नाही. घरी बसल्या सुद्धा नारायण धाव घेत असतो. त्या पांडुरंगाचा महिमा अगाध आहे. त्याला काही नको. फक्त मनाची एकाग्र स्थिती व सतशुद्ध ठेवण पाहिजे. मनाच्या सतशुद्ध भावनेने, एकाग्रतेने जर पांडुरंगाचा ठाव घेतला तर ते पांडुरंग घरी येतात. त्यांचा शोध घ्यावा लागत नाही. एकाच ठिकाणी बसून त्यांच्या ठिकाणी चित्त स्थिर केले तर ते घरी येत असतात. त्याचा ठाव घेण्यासाठी मन त्यांच्या चरणावर एकाग्र केले पाहिजे. एकच बीज म्हणजे नाम सर्वत्र विखुरले आहे. सर्वत्र शोधले ठाव घेतला पाहिजे तरी पण मन एकाग्र केल्यानंतर ते आपणातच प्रगट आहे याचा प्रत्यय येतो. असा नामाचा महिमा अगाध अन मोठा आहे ज्याला याचे वर्म मिळाले तो पांडुरंगमय होतो. (पुढे सुरु….२)©️

You cannot copy content of this page