Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! ©️

नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! ©️

मालिक एकचित्त – नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! काही एक नव्हते, असे काही मानवांचे म्हणणे आहे. पाचही तत्वे नव्हती, मग यांचा कर्ता कोठे होता? ते ब्रह्म कोठे राहिले होते? मी मागेच सांगितले आहे. मला कर्ता करविता कोणीही नाही. मी अखंड आहे. मला नाही आई बाप. मी स्वयमेव आहे. याची गती मानवाला नाही.

पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना झाल्यानंतर, मानवांची उत्पत्ती केली. प्रकृतीच्या अनुसंधनाने मानवा मानवात वितंडवाद निर्माण होतो. पण, सत् कोठे आहे? कसे आहे? कोणीही पाहिलेले नाही. मी सर्वभूतेषु पश्य आहे. ही गती त्यांना नाही. पण अमुकच हे आहे असे कोणी दाखविलेले नाही. म्हणून प्रकृतीचा भांड निर्माण होतो. त्यामुळे भेदाभेद निर्माण झाले. जो तो आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. आपले सर्वस्व स्थापण्याचा प्रयत्न करतात. मानव मनाच्या आधीन गेला तर मन बुध्दीच्या चाकोरीने जाते. मी जर अभिन्न आहे, तर मानवाने माझी ओळख का करून घेऊ नये? मी अभिन्न आहे, हे जर कळले असले, तर तो फसणार नाही. पण प्रकृतींच्या चाळ्यांमुळे तो फसतो.

मानवानीच जातीवर्ण निर्माण केलेत, धर्माच्या शाखा निर्माण केल्यात, हे मी सांगितले आहे. मानवाने जर सत् भक्तिची गती घेतली तर, जातीयवाद निर्माण होईल का? या चाकोरीने गेला तर त्याला सर्वस्व एकच दिसेल. सर्व संतांनी सांगितले आहे, त्यांनी गती घेतली, त्यांना एकच तत्व दिसत होते. त्यांनी सांगितले त्यात काही वावगे नाही. पण हल्लीचा मानव अहंकाराने बरबटलेला आहे. अशा मानवामुळे भक्तीचे लोण वाढत नाही. सत भक्तीने जाणारा जगात कोणी नाही, फार विरळा आहे.©️ पुढे सुरु….२

You cannot copy content of this page