Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

मानवाला भक्तीचे अंग ….. २ ©️

मानवाला भक्तीचे अंग ….. २ ©️

काही गुरु चेले बनविण्यासाठी वाटेल ते सांगतात. त्याप्रमाणे तो माणूस वाटेल ते बोलतो. पण याठिकाणी अशी पद्धत नाही.

कांहीं ठिकाणी आम्हाला तसे दिसत नाही. ते म्हणतात, “तन-मन-धन अर्पण केले असे म्हण.” पण तन-मन-धन हे काय आहे? ही मेख तरी मानवाला सापडली आहे का? तन-मन-धन कोण कोणाला वाहतो? म्हणून या ठिकाणी ती पद्धत नाही. त्याचे कारण काय? त्याचे कारण समर्थांनी जाणले आहे.

जडाची निर्मिती माझ्यापासून आहे. मन हे सुद्धा माझ्यापासूनच आहे. तनाच्या व मनाच्या सलोख्याने कमावलेले धन कोणाचे? ते पण समर्थ म्हणतात, “माझे आहे.” मग मानव देऊन देऊन काय देणार मला? इतकेच, ज्योतीच्या भावनेची पाहणी करतात. नंतर अनुग्रहासाठी आदेश सुटतात. त्या सर्व गोष्टी ते ध्यानात ठेवतात.

इतकेच की मनाला मोकळीक देतात. त्याचे कारण काय? ते त्यानाच माहीत असते. मनाला मोकळीक दिली नाही, मन माझ्या आटोक्यात ठेवले तर सेवेकरी मानवी तऱ्हेने संसार करील का नाही ही शंका आहे. म्हणून मनाला मोकळीकता दिलेली आहे. सर्वांची मने स्थीर आहेत की नाहीत ते त्यांनीच ओळखावे. प्रत्येक सेवेकऱ्याने आपले मन सद्गुरु चरणांवर बहाल केले आहे की नाही हे त्यानेच पहावे. या आसनाच्या नियमाप्रमाणे सेवेकरी चालतात का? माझ्या भक्तीत रममाण होणारा भक्त असेल तर त्याला बडव्यांचे सोटे खाण्याची काय आवश्यकता आहे? त्या ठिकाणी हौसे, नौशे, गौसे येतात. त्यांना बडव्यांनी ठोकले तर बिघडले कुठे? ©️

You cannot copy content of this page