Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

आपले सद्गुरु ….कपिल मुनी ©️

आपले सद्गुरु ….कपिल मुनी ©️

आपले सद्गुरू कसे आहेत, ते कोणत्या रितीने सांगत आहेत, त्याचा अंत घेणे. या कुडीतून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्यांना एकदा तरी डोळे भरून पाहणे. ज्यांनी पाहिले, अंत घेतला, तोच भाग्यवान होय.

अंत घेणे जितके कठीण, तितकेच ते सोपे आहे. आपला सेवेकरी वाममार्गी गेला, तरी सद्गुरु त्याच्यासाठी किती प्रयत्न करतात की, तू असा चल ! या मार्गाने जा ! जर गेला नाहीस तर यांच्यात जे सत आहे, ते तूला मिळणार नाही.

कसलीही जाणीव न ठेवता, आपल्या ध्यानात, नामांत दंग व्हावयास पाहिजे आणि याच तऱ्हेने लय व्हावयास पाहिजे. अशा ज्योतींना मालिक दूर लोटणार नाहीत. प्रत्येकाने या मार्गाने जाणे. आपली चूक कबूल करणे.

मी सुद्धा सात वर्षांचा होतो, त्यावेळी जे सत् संस्कार झाले, तेच शेवटपर्यंत टिकले. या आनंदातच मी याठिकाणी आलो. हे माझे सर्वस्व ! हेच माझे माहेर घर आहे. याठिकाणी आल्यानंतर जो आनंद होतो, जी आनंदाची लुट मिळते, ती इतरत्र कुठेही नाही. सद्गुरू शिवाय कोणीही तारक नाहीत. त्यांच्या आज्ञेत राहणे. त्याप्रमाणे कृती करणे, हे प्रत्येक सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. सेवेकरी मालकांचा आहे. त्या आज्ञेची, आदेशाची किंमत न ठेवणे, ही महान चूक आहे. तिला क्षमा कशी मिळेल? तेव्हा सद्गुरू नामात दंग होणे. प्रकाशात गुंग असणे, हाच खरा आनंद होय. (समाप्त)

You cannot copy content of this page