Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

आपले सद्गुरु ….कपिल मुनी ©️

आपले सद्गुरु ….कपिल मुनी ©️

आपले सद्गुरू कसे आहेत, ते कोणत्या रितीने सांगत आहेत, त्याचा अंत घेणे. या कुडीतून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्यांना एकदा तरी डोळे भरून पाहणे. ज्यांनी पाहिले, अंत घेतला, तोच भाग्यवान होय.

अंत घेणे जितके कठीण, तितकेच ते सोपे आहे. आपला सेवेकरी वाममार्गी गेला, तरी सद्गुरु त्याच्यासाठी किती प्रयत्न करतात की, तू असा चल ! या मार्गाने जा ! जर गेला नाहीस तर यांच्यात जे सत आहे, ते तूला मिळणार नाही.

कसलीही जाणीव न ठेवता, आपल्या ध्यानात, नामांत दंग व्हावयास पाहिजे आणि याच तऱ्हेने लय व्हावयास पाहिजे. अशा ज्योतींना मालिक दूर लोटणार नाहीत. प्रत्येकाने या मार्गाने जाणे. आपली चूक कबूल करणे.

मी सुद्धा सात वर्षांचा होतो, त्यावेळी जे सत् संस्कार झाले, तेच शेवटपर्यंत टिकले. या आनंदातच मी याठिकाणी आलो. हे माझे सर्वस्व ! हेच माझे माहेर घर आहे. याठिकाणी आल्यानंतर जो आनंद होतो, जी आनंदाची लुट मिळते, ती इतरत्र कुठेही नाही. सद्गुरू शिवाय कोणीही तारक नाहीत. त्यांच्या आज्ञेत राहणे. त्याप्रमाणे कृती करणे, हे प्रत्येक सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. सेवेकरी मालकांचा आहे. त्या आज्ञेची, आदेशाची किंमत न ठेवणे, ही महान चूक आहे. तिला क्षमा कशी मिळेल? तेव्हा सद्गुरू नामात दंग होणे. प्रकाशात गुंग असणे, हाच खरा आनंद होय. (समाप्त)

You cannot copy content of this page