Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

काढीला बोल, न ठरे फोल, कृतीने बोल, पूर्ण करी……©️

काढीला बोल, न ठरे फोल, कृतीने बोल, पूर्ण करी……©️

अलख – आपल्या दरबारची चार तत्वे आहेत. जो बोल काढला, त्या बोलाला महत्व आहे. तो सत् करा. जी कृती हाती घेतली, ती पूरी करा. ते न करता, सेवेकरी दुसरेच करतो. जे गुरू, ज्यांचा शिरी हस्त पडला, त्यांनी मार्ग दाखविला, त्यांची ओळख ठेवणे, त्यांना पाहणे कठीण तितकेच सोपे देखील आहे. पण कसे? त्या मार्गाने गेलात तर! प्रथम शुध्दता पाहिजे. शुद्ध पाहिजे तो कसा? आंघोळीने नाही. त्यानें फक्त बाहेरचा मळ साफ होईल. आतला काळेपणा तो साफ कसा होईल? त्याला काय केले पाहिजे? त्याला एकच साधन, ते म्हणजे अखण्ड नाम ! त्या नामात राहशील तर मन साफ होईल. असे जर नसेल, या प्रमाणे सेवेकरी जर वागत नसेल, तर आपल्या कृतीनेच असत संचित घडवीत असतो. हरीच्या कृपेने सावरत असतात. सत कृतीने गेल्यास, हरीच्या कृपेने असत संचिताचा नाश होईल.

आपल्या सेवेकऱ्यास सदगुरू पदानेच मान मिळाला पाहिजे. कोणी प्रश्न विचारले, तर उत्तरे देता आली पाहिजेत. म्हणजे आपल्या सताचा पाया भक्कम असेल, तर ठामपणे उत्तर द्याल. मालिक छायेप्रमाणे मागे असतात. मालिक सांगताना पुष्कळ सांगतात, पण सेवेकरी आपल्या हाताने करून घेतात. मालिक काहीच करीत नाहीत.

सेवेकरी म्हणतील, येथून उतरल्यावर आसन रिकामे असते, तर आसन कधीही रिकामे नसते. मालिक येथेच बसलेले असतात. स्थूलांगी तिकडे जातात. आपण काहीही केले, तरी त्यांच्या नजरेतून सुक्ष्माहूनही सुक्ष्म सुटत नाही. ©️

You cannot copy content of this page