Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

काढीला बोल, न ठरे फोल, कृतीने बोल, पूर्ण करी……©️

काढीला बोल, न ठरे फोल, कृतीने बोल, पूर्ण करी……©️

अलख – आपल्या दरबारची चार तत्वे आहेत. जो बोल काढला, त्या बोलाला महत्व आहे. तो सत् करा. जी कृती हाती घेतली, ती पूरी करा. ते न करता, सेवेकरी दुसरेच करतो. जे गुरू, ज्यांचा शिरी हस्त पडला, त्यांनी मार्ग दाखविला, त्यांची ओळख ठेवणे, त्यांना पाहणे कठीण तितकेच सोपे देखील आहे. पण कसे? त्या मार्गाने गेलात तर! प्रथम शुध्दता पाहिजे. शुद्ध पाहिजे तो कसा? आंघोळीने नाही. त्यानें फक्त बाहेरचा मळ साफ होईल. आतला काळेपणा तो साफ कसा होईल? त्याला काय केले पाहिजे? त्याला एकच साधन, ते म्हणजे अखण्ड नाम ! त्या नामात राहशील तर मन साफ होईल. असे जर नसेल, या प्रमाणे सेवेकरी जर वागत नसेल, तर आपल्या कृतीनेच असत संचित घडवीत असतो. हरीच्या कृपेने सावरत असतात. सत कृतीने गेल्यास, हरीच्या कृपेने असत संचिताचा नाश होईल.

आपल्या सेवेकऱ्यास सदगुरू पदानेच मान मिळाला पाहिजे. कोणी प्रश्न विचारले, तर उत्तरे देता आली पाहिजेत. म्हणजे आपल्या सताचा पाया भक्कम असेल, तर ठामपणे उत्तर द्याल. मालिक छायेप्रमाणे मागे असतात. मालिक सांगताना पुष्कळ सांगतात, पण सेवेकरी आपल्या हाताने करून घेतात. मालिक काहीच करीत नाहीत.

सेवेकरी म्हणतील, येथून उतरल्यावर आसन रिकामे असते, तर आसन कधीही रिकामे नसते. मालिक येथेच बसलेले असतात. स्थूलांगी तिकडे जातात. आपण काहीही केले, तरी त्यांच्या नजरेतून सुक्ष्माहूनही सुक्ष्म सुटत नाही. ©️

You cannot copy content of this page