Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

ज्ञानाची मूर्ती (२) ©️

ज्ञानाची मूर्ती (२) ©️

आपला मार्ग कोणता? नाम कोणी दिले? कोणाच्या नामात दंग? ते सद्गुरू कोणते? याची पाहणी करण्याकरीता त्यांच्यात दंग असावयास पाहिजे. मालिक जाणीव देतात. पण सेवेकरी ऐकत नाही. 

मालिक सांगतात ते हिताचेच सांगतात, मग सेवेकऱ्याने असे कां करावे? माया सर्वांना आहे. ज्याच्या पाठीशी अखंड तत्व, त्याला माया काय करणार आहे? ज्याच्या पाठीशी (ते) नाहीत, त्याला माया कबजा करते. आचार, विचार, कृती सर्वस्व सत् मनानें शुद्ध असल्यावर मायेचे काही चालत नाही. मग सर्वस्व शुध्दच राहते. जरा अशुद्धपणा आला, मनानें गढूळ झाला, तर सर्वस्व गढूळ होते. 

आपणाला पुष्कळ वेळा सांगितले आहे की, दिवसातून तीन वेळा मालकांची फेरी असते. काहींच्या घरी वादविवाद चालू असतात. मालकांना त्याठिकाणी थांबावे असे वाटत नाही. ते कां? मग, तू आणि अहंपणा यांच्यामुळे कां? तू काय बरोबर घेऊन आला आहेस? तर गेल्या जन्मांचे संचित! मग माझे तुझे कां म्हणावे? हे कोणाचे आहे? 

हा संसार सद्गुरुंचा आहे. सर्व त्रिभुवनाचा संसार एका ठिकाणी बसून पहात असतात. हे सेवेकऱ्यांनी समजावयास पाहिजे. संसाराला रित पध्दत असते. संसाराची दोन्ही चाके सरळ असतील, वरचे सामान सरळ असेल, तर संसार गाडा सुरळीत चालेल. तिचे चाक सरळ नसल्यास संसार गाडा डळमळीत होऊन सामान पडून जाईल. हे समजावयास पाहिजे. माझे तुझे काय आहे? काय बरोबर नेणार आहे? काय घेऊन जाणार आहे? ते सेवेकऱ्यांनी समजावयास पाहिजे. कांहीना हे समजत नाही. वाटेल तसे, वाटेल त्यावेळी स्वतःशी व इतरांशी बडबडतात. सेवेकरी काय करतात? सांगितले काय आणि सेवेकरी करतात काय? मालिक म्हणतात, करतो तर करु द्या ! सांगून ऐकत नाही. त्यांचे कर्मसंचित तो भोगील. (Contd.3)©️

You cannot copy content of this page