Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

आषाढी एकादशी (२) ©️

आषाढी एकादशी (२) ©️

नंतर ज्या पदाला शरण आहात, तेथे पूर्ण लक्ष देवून, तेथून ज्या नामाची जाणीव, त्यात गुंग होणे, यालाच म्हटले आहे, उपवास !  

       हल्लीचे मानव तसे नाहीत. सर्व ठिकाणी एकच माऊली वास करते. पण प्रकृतीचे ढंग केव्हाही जाऊ शकणार नाहीत. प्रकृतीच्या अंगाने पाहुर लागल्यास वितंड वाद होऊ लागतात आणि संता संतात सुद्धा पुढें बोलणे नको. माझी इच्छा संत पंढरीतच यावेत अशी मुळीच नाही. येथे न येता सुद्धा विठ्ठलाच्या विठ्ठलाचेही दर्शन घेऊ शकते. 

       मात्र असे कोणी केले आहे का? 

       मानवाला शांती मिळत नाही. चित्त लागत नाही. आषाढी एकादशी आली आहे म्हणून पंढरीला येण्याचा प्रयत्न करतात. 

       हल्लीच्या एका तरी संताने खऱ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे का? आहे जर म्हणावे, तर इथपर्यंत येण्याची गरज नाही. नामदेव, तुकाराम इत्यादींना ज्या चरणांचे दर्शन झाले, त्यालाच विठ्ठल, पांडुरंग, राम, कृष्ण म्हटलेले आहे. आत्ताचे संत इथपर्यंत पोहचलेले नाहीत. हा सर्व मायेचा पसारा आहे. एकही संत, एकही साधू निष्काम भक्तीने येथे आलेला नाही. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page