Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

आषाढी एकादशी (२) ©️

आषाढी एकादशी (२) ©️

नंतर ज्या पदाला शरण आहात, तेथे पूर्ण लक्ष देवून, तेथून ज्या नामाची जाणीव, त्यात गुंग होणे, यालाच म्हटले आहे, उपवास !  

       हल्लीचे मानव तसे नाहीत. सर्व ठिकाणी एकच माऊली वास करते. पण प्रकृतीचे ढंग केव्हाही जाऊ शकणार नाहीत. प्रकृतीच्या अंगाने पाहुर लागल्यास वितंड वाद होऊ लागतात आणि संता संतात सुद्धा पुढें बोलणे नको. माझी इच्छा संत पंढरीतच यावेत अशी मुळीच नाही. येथे न येता सुद्धा विठ्ठलाच्या विठ्ठलाचेही दर्शन घेऊ शकते. 

       मात्र असे कोणी केले आहे का? 

       मानवाला शांती मिळत नाही. चित्त लागत नाही. आषाढी एकादशी आली आहे म्हणून पंढरीला येण्याचा प्रयत्न करतात. 

       हल्लीच्या एका तरी संताने खऱ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे का? आहे जर म्हणावे, तर इथपर्यंत येण्याची गरज नाही. नामदेव, तुकाराम इत्यादींना ज्या चरणांचे दर्शन झाले, त्यालाच विठ्ठल, पांडुरंग, राम, कृष्ण म्हटलेले आहे. आत्ताचे संत इथपर्यंत पोहचलेले नाहीत. हा सर्व मायेचा पसारा आहे. एकही संत, एकही साधू निष्काम भक्तीने येथे आलेला नाही. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page