Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

आषाढी एकादशी ©️

आषाढी एकादशी ©️

एकांत म्हणजे एकाचाच अंत घेणे येणे नाम एकांत !

एकादशी म्हणजे दश इंद्रिये एकात मिलन करणे. एकचित्त समर्थांचे चरणात होणे. दश इंद्रिये अकराव्यात मिलन करणे येणे नाम एकादशी !

आता दश इंद्रिये एकात मिलन होतील कशी? तर ज्या ठिकाणी आपण शरण आहात, तेथे मनाने सर्व अवयव कोंडून ठेवायला हवेत. म्हणजे दश इंद्रिये एकात मिलन होऊ शकतात. म्हणजे ती सदगुरू माऊली स्वतः होऊन आपणच सर्वस्व करीत असते.

पुढें उपवास ! एकादशी उपवास म्हणजे काय? याचे विवरण पुष्कळ वेळा केले आहे हे सांगावयास नको. ©️

You cannot copy content of this page