Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

नामस्मरण ©️

नामस्मरण ©️

ज्या भोजनाची मला आवड आहे, त्या भोजनाने माझी तृप्ती झाल्यानंतर येथपर्यंत येऊ शकतात. ते नाम, ते भोजन कोणत्या तऱ्हेने व्हायला पाहिजे? सर्वस्वाचा त्याग करून, जो का या एकातच रमला, तोच परम पदी पोहचू शकला. नाहीतर *नामस्मरण* करतो, परंतु मनाची भावना भलतीकडे असते नाम चालू असून देखील मन कशात तरी गुंतलेले आहे, तर काय उपयोग?

आजचा दिवस गेला, उद्या काय? मुला माणसांकडे लक्ष, इतर विचार? असे सर्व विचार करताना, तो नामात तल्लीन होऊ शकत नाही. नाम हे साधन आहे. या नामामुळेच कित्येकांचा उद्धार झाला आहे. जलात जरी टाकले तरी तो तरुण निघतो. नामाने महान महान पातकांचा सुद्धा नाश केला जातो. हे एकच नाम त्रिभुवन व्याप्त आहे आणि त्रिभुवन व्यापून देखील अलिप्त आहे. म्हणून आज आसनावरून नामाचा महिमा व त्यावर प्रवचन झाले आहे. आणखी मी काय विशेष सांगू? नाम घेतो म्हणून जमत नाही. ज्या ठिकाणी शरण त्या ठिकाणाला दृढ भाव धरून नामाची आठवण ठेवणें, नामस्मरण करणे, मनाची चल बिचल झाली तर त्या ठिकाणी अर्पण करणे, मग मन कोठेही धावू शकत नाही. ©️

You cannot copy content of this page