Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

नामस्मरण ©️

नामस्मरण ©️

ज्या भोजनाची मला आवड आहे, त्या भोजनाने माझी तृप्ती झाल्यानंतर येथपर्यंत येऊ शकतात. ते नाम, ते भोजन कोणत्या तऱ्हेने व्हायला पाहिजे? सर्वस्वाचा त्याग करून, जो का या एकातच रमला, तोच परम पदी पोहचू शकला. नाहीतर *नामस्मरण* करतो, परंतु मनाची भावना भलतीकडे असते नाम चालू असून देखील मन कशात तरी गुंतलेले आहे, तर काय उपयोग?

आजचा दिवस गेला, उद्या काय? मुला माणसांकडे लक्ष, इतर विचार? असे सर्व विचार करताना, तो नामात तल्लीन होऊ शकत नाही. नाम हे साधन आहे. या नामामुळेच कित्येकांचा उद्धार झाला आहे. जलात जरी टाकले तरी तो तरुण निघतो. नामाने महान महान पातकांचा सुद्धा नाश केला जातो. हे एकच नाम त्रिभुवन व्याप्त आहे आणि त्रिभुवन व्यापून देखील अलिप्त आहे. म्हणून आज आसनावरून नामाचा महिमा व त्यावर प्रवचन झाले आहे. आणखी मी काय विशेष सांगू? नाम घेतो म्हणून जमत नाही. ज्या ठिकाणी शरण त्या ठिकाणाला दृढ भाव धरून नामाची आठवण ठेवणें, नामस्मरण करणे, मनाची चल बिचल झाली तर त्या ठिकाणी अर्पण करणे, मग मन कोठेही धावू शकत नाही. ©️

You cannot copy content of this page