Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अद्वैत भक्ति (३) ©️

अद्वैत भक्ति (३) ©️

सेवेकरी ज्यावेळेला शरण जातो, तो कोणाला शरण जातो? जे त्रिभुवन व्याप्त असून, अलिप्त आहेत, तेच आसनाधिस्त असून, त्यांनाच सेवेकरी शरण जातो. तेच ठिकाण परम शांतीचे माहेरघर, परमधाम, आश्रयस्थान, सर्व सुखांचे परमोच्च निदान आणि त्याच ठिकाणी शांतीही अखंड नांदत असते. तेच मोक्षाचे ठिकाण होय. तोच मोक्ष होय.

मग आसनाधिस्तानी सांगितल्याप्रमाणे वाटचाल करीत करीत मन एकदम शुद्ध स्फटीकासारखे झाले म्हणजे तिच माऊली जाणीव देत असते. तिच दाखवून देते की, तू आणि मी एकच आहे. पहा……. असे जर आहे की, त्याच ठिकाणी शरण जायचे, मग ही आरशाची छबी कशाला? आरसा कशाला? हि सोंग, ढोंग काय कामाची? छबीची, आरशाची, फोटोची, प्रतिमेची पूजा करून तो केव्हांही जवळ येऊ शकत नाही. म्हणजेच येथे द्वैत आहे. ज्या सेवेकऱ्याला ज्या ठिकाणी शरण आहे, तेच ठिकाण सर्व ठिकाणी दिसेल. तो मात्र हालचाल इकडे तिकडे केव्हाही करणार नाही. प्रत्येक सेवेकऱ्याने ह्याच्यावर विचार करावा.

ईश्वरी तत्त्व कोठे आहे? या सर्वांचा परिपूर्ण विचार करावा. या पलीकडे काहीं सांगण्याची आवश्यकता नाही.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page