Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

दरबार महती……(२) ©️

दरबार महती……(२) ©️

चार दिशेला चार दरबार आहेत. दक्षिण, उत्तर व पूर्वेला एक एक दरबार आहे. उत्तरेच्या बाजूला जो दरबार आहे, त्याची गोपाल स्वामी नाम घेऊन स्थापना झाली.

वेषांतर – जठाधारी – अशा प्रकारचे आहे. पूर्वेच्या बाजूला जो दरबार आहे, त्या दरबारात आतापर्यंत तीन तऱ्हेची कार्ये होत आली. त्यात तीन ज्योती निर्माण झाल्या. प्रथम ज्योतीचे नामाभिधान सुजेंद्रनाथ होय.

हि प्रथम ज्योत निर्माण केल्यानंतर पूर्व जन्माप्रमाणे विलीन झाली. (मधली ज्योत गुप्त आहे) आता तिसरी ज्योत सुजेंद्रनाथ या नावानेच चालली आहे. तिचे नामाभिधान सुजेंद्रनाथ दयाळजी असे आहे. (दयाळ स्वामी अशा प्रकारचे आहे.)

त्या ठिकाणी प्रवेश नाही. फक्त प्रवचन होत असते. त्यात विवेकानंद, दयानंद, राधास्वामी अशा अनेक ज्योती झाल्या आहेत. त्यांनी कार्ये अनेक तऱ्हेची केली. मधल्या ज्योतीच्या हातून काहीतरी घडले म्हणून गुप्त आहे.

दक्षिण दिशेला विशाखापट्टणमच्या बाजूला अशा दरबारची स्थापना झालेली आहे. त्या ठिकाणी कन्नमवार स्वामी आहेत. त्या ठिकाणीही प्रवेश नाही. पण अशा तऱ्हेने गुप्त संदेश घेत असतात. आसन घातलेले आहे. ज्योती आसनावर आहेत. परंतु गुप्त संदेश घेत असतात.

या ठिकाणी आल्यानंतर त्याची पातळी पाहून सर्व काही होते. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळते. भूमी शुद्ध झाल्या नंतर प्रथम उपदेश, नंतर आदेश, नंतर अनुग्रह असा क्रम आहे.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page