Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

दरबार महती……(२) ©️

दरबार महती……(२) ©️

चार दिशेला चार दरबार आहेत. दक्षिण, उत्तर व पूर्वेला एक एक दरबार आहे. उत्तरेच्या बाजूला जो दरबार आहे, त्याची गोपाल स्वामी नाम घेऊन स्थापना झाली.

वेषांतर – जठाधारी – अशा प्रकारचे आहे. पूर्वेच्या बाजूला जो दरबार आहे, त्या दरबारात आतापर्यंत तीन तऱ्हेची कार्ये होत आली. त्यात तीन ज्योती निर्माण झाल्या. प्रथम ज्योतीचे नामाभिधान सुजेंद्रनाथ होय.

हि प्रथम ज्योत निर्माण केल्यानंतर पूर्व जन्माप्रमाणे विलीन झाली. (मधली ज्योत गुप्त आहे) आता तिसरी ज्योत सुजेंद्रनाथ या नावानेच चालली आहे. तिचे नामाभिधान सुजेंद्रनाथ दयाळजी असे आहे. (दयाळ स्वामी अशा प्रकारचे आहे.)

त्या ठिकाणी प्रवेश नाही. फक्त प्रवचन होत असते. त्यात विवेकानंद, दयानंद, राधास्वामी अशा अनेक ज्योती झाल्या आहेत. त्यांनी कार्ये अनेक तऱ्हेची केली. मधल्या ज्योतीच्या हातून काहीतरी घडले म्हणून गुप्त आहे.

दक्षिण दिशेला विशाखापट्टणमच्या बाजूला अशा दरबारची स्थापना झालेली आहे. त्या ठिकाणी कन्नमवार स्वामी आहेत. त्या ठिकाणीही प्रवेश नाही. पण अशा तऱ्हेने गुप्त संदेश घेत असतात. आसन घातलेले आहे. ज्योती आसनावर आहेत. परंतु गुप्त संदेश घेत असतात.

या ठिकाणी आल्यानंतर त्याची पातळी पाहून सर्व काही होते. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळते. भूमी शुद्ध झाल्या नंतर प्रथम उपदेश, नंतर आदेश, नंतर अनुग्रह असा क्रम आहे.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page