Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सुधारणा झाली पाहिजे, कुधारणा सोडली पाहिजे ©️

सुधारणा झाली पाहिजे, कुधारणा सोडली पाहिजे ©️

खरे आहे ! मन मोठे चमत्कारीक आहे. मनाच्या ठिकाणी एक दृष्टी. त्यानंतर म्हणतो, मालिक, तुम्हीच सर्वस्व करा. त्याचा तो कुटुंबासहित सुखी असतो. नोकरी तब्येत याबाबत नेहमी तक्रारी असतात.

योगी, पूर्वीचे मानव हे मनाने ठाम होते. आपण ठाम असता कां? – कधी, केव्हा? जो मनाने ठाम, तोच सतात रममाण होतो. नंतर त्याला दरबार समजू लागतो. प्रत्येक सेवेकरी शुद्ध, शांत, सरळ व्हावयास पाहिजे, परंतु तो होत नाही. कुठला सेवेकरी झाला आहे कां?

मी जास्त किंवा कमी केले असे सेवेकरी समजतात, परंतु कर्तव्य करून घेणारे निराळे असतात. मी केले असे म्हणू नये. हे जर समजले तर मी दूर नाही. आदीअंता पासून सद्गुरू, योगी होऊन गेले व सतात रममाण झाले.

जे मायेमध्ये रममाण झाले, त्यांच्यावर मायेचा कब्जा असतो. आसनाधिस्त सांगतात, त्याप्रमाणे शुद्ध, सरळ मार्गी ज्योती होण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे अभ्यास करावा.

योगी होऊन गेले. तत्त्व, नाम, जप हे सर्व निराळे नाही. स्थूल प्रत्यक्ष कर्तव्य करीत असते. अदृश्याच्या कर्तव्याचा अंतपार नाही.

सेवेकर्‍यांनी स्थिर ठाम का होऊ नये? जोपर्यंत स्थुल आहे, तोपर्यंत गतिमान व्हा ! नंतर मी जाणतो काय करावयाचे? गतिमान व्हा ! सर्वस्व करून घेतले जाईल. त्याप्रमाणे करूनही घेतात. आपल्या संचितात असत भर घालू नका. संचिता मध्ये हेवा दावा घडवू नये असे संदेश आहेत. प्रत्येकामध्ये सुधारणा झाली पाहिजे. कर्तव्यात रहा, मग ते जवळच आहेत. एक वेळ चुकेल त्या चुकीस क्षमा आहे. परंतु परत परत क्षमा करावी का? क्षमा मागण्यास ना अंत ना पार. आपणच सुधारल्यानंतर क्षमा मागण्याची काय आवश्यकता असते? जाणून बुजून चुकावयाचे नाही. सानिध्यात असताना अभ्यास करावा. मग क्षमा मागण्याची आवश्यकता नाही. चुकू लागल्यानंतर मग क्षमेला अर्थ नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page