Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सद्गुरु दर्शन, मुक्तीचा मार्ग ! ©️

सद्गुरु दर्शन, मुक्तीचा मार्ग ! ©️

अलख – तुम्हीं प्रथम आपल्या गुरूंचे दर्शन मिळविले तरच पुढे मार्ग मिळेल. गुरू दर्शन सोपे नाही. गुरू दर्शन हाच शेवट मुक्तीचा मार्ग आहे. ज्याने मिळविले, तो धन्य होय. त्यानेच मानव जन्मात येण्याचे सार्थक केले असे होईल.

मानव हा कसा असतो? त्याला माया हवी असते. कितीही वळण घालण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्या तालातच असतो. मानवाचे मन तालात असते. तेच जर शुद्ध असेल, तर दाही इंद्रिये ताब्यात येतील. तेच जर गढुळ झाले तर सर्वस्व गढुळ होईल. काही सेवेकरी असत मार्गाला जातात. त्यांना मालिक, लिला, लाघव करून, जाग्यावर आणतात. ते का? तर असत मार्गानें जावू नये म्हणून!

पूर्वी आर्यवर्तात गुरुकुलांत जी मुलें शिकत असत. त्यांना एवढी वळणे नव्हती. एकच धडा देत असत. तो करीत ते बसत. या ठिकाणी कितीतरी पटीने ज्ञान मिळते. सर्वस्व सांगण्यात येते. तरी सेवेकरी करीत नाहीत. ह्या मार्गाने जात नाहीत. पूर्वी एकच धडा देवून नाना तऱ्हेने त्याचा कस घेतला जात असे. त्या कसाला ते उतरत असत.

आता काळ नवीन आहे. मानवांच्या मनाप्रमाणे नवीन आहे. मानवाच्या मनात अविनाशी आत्मा जागृत नसेल, तर मानव काय करणार? जागृत म्हणजे कसा? त्यानें जर कृपादृष्टीने पाहिले नाही, तर चलन वलन कसे होईल? म्हणून जागृत म्हटले आहे. ©️

You cannot copy content of this page