Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

श्री समर्थ मालिक वाणी ©️

श्री समर्थ मालिक वाणी ©️

आपणाला ज्ञान केव्हां मिळत नाही?

आपणाला ज्ञान नेहमी मिळते. काहीना ज्ञान आहे. काहीना गती माहिती नाही. ते ज्ञान आता देत आहे. पूर्णपणे पाहून घ्या. काही कसर करू नका. आता, ज्ञान नाही, त्यांना ज्ञान देण्यात येत आहे. दोन्ही हातांनी आपणाला ज्ञान देण्यात येईल. पाहणारे ते आपण पाहू शकता.

आपण म्हणाला होतात, श्रावण महिन्यामध्ये मानव शुद्ध आणि पवित्र मानतात. हि मनाची ओढ आहे. ते पाहणे म्हणजे मायावी आहे. येथे जे ज्ञान देत आहे, ते अखंड राहणार आहे.

शुद्ध आणि अशुद्ध (असे) काहीच नाही. श्रावण महिना शुद्ध हे मानवाने मनाने केले आहे. शुध्दात पण मी आहे आणि अशुद्धात पण मी आहे. ही दोन्हीं मला समान आहेत.

अशुद्ध आणि शुद्ध पाहण्याचे काहीच कारण नाही. श्रावण महिन्यामध्ये सण जास्त येतात, असे तुम्हीं म्हणता, पण आपण जर केले नाहीत, तर सण होणार नाहीत.

मानव जन्माला येतो तो दिवस पण सण म्हणून पाळला पाहिजे. त्या प्रमाणे मानव करीत आहे का? जर तो उत्सव करीत राहीला, तर तो सुद्धा सणच होऊन बसतो. मग त्यात काय अवघड आहे.

मुळ मायेने आपलीच पुजा व्हावी म्हणून केलेले प्रयोग !

हा दरबार मोडावा म्हणून, प्रयत्न चालले होते. मुळाश्रमातील सर्व ज्योतींवर प्रयोग केले. मुळाश्रमातील ज्योतींची मने एकमेकाला मिळू नयेत, म्हणून वनस्पती प्रयोग केले आणि ज्यावेळी आपण प्रथामच पूजेला लागले, त्यावेळी माझीच पूजा व्हावी म्हणून प्रयोग केले. अगणित प्रयोग केले. दरबारच्या कामात व्यत्यय येऊन त्याचा गाडा खिळखिळा करावा म्हणून प्रयोग केले. दोन वर्षे प्रयोग करीत आहे. त्याची गणती माझ्याजवळ नाही. अगणित त्रास दिला.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page