Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

शरण (२) ©️

गुरू म्हणून शरण आलात, मग ती सद्गुरु माऊली कशीही असो, आसनावर बसलेली आहे, त्यांना जे पूज्य मानतील त्याच सेवेकऱ्याना त्यांची ओळख पटेल आणि जर जर का तो तेथे चोखाळा करीत राहिला, तर मात्र त्याचाच चोखाळा होईल.

ज्या मानवाला, तू मानव आहेस की, कोण आहेस याची ओळख ज्या व्यक्तीने करून दिली, त्याला खालीवर पाहणे, त्याचा कस घेणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य नव्हें. जर का त्याने असे केले, तर तो स्वतः त्यात फसेल आणि जो काहीही होवो, कसेही होवो, परंतु जो त्या ठिकाणी शरण आहे व त्या स्थानाला पूज्य व पवित्र मानेल, अशा व्यक्तीला वाटेल तेव्हढा त्रास झाला तरी त्यातून तो पार पडणारच म्हणून समजा वा पार पडलाच म्हणून समजा. त्याला कशाचीही भिती नाही. याच्या पलीकडे काय सांगू?

मानव हा संशयी आहे. मग त्याला खरे वाटणे फारच कठीण आहे. पावलो पावली मनाची चंचलता, बुद्धीमत्ता पालटते. दृष्टी दाही दिशा फिरते. दृष्टी समोर नजरेस पडेल, तेच त्याला खरे वाटते. पण जे कधी दिसत नाही, पाहण्यात नाही, पाहू शकत नाही, पाहणार नाही ते त्याला सत्य वाटणे अशक्य आहे. त्याला ते करता येणार नाही. करणार नाही. करू शकणार नाही. फक्त वरपांगी ढोंग करण्याचा प्रयत्न करीत राहिल. त्याला अर्थ नाही.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page