Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

वेळ आली म्हणजे…©️

वेळ आली म्हणजे…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकर्‍यांची कल्पना चांगली आहे, स्थूलावर कर्तव्य व्हावे. वेळ आल्यानंतर कर्तव्य करा सांगण्याची आवश्यकता नसते. वेळ आल्यानंतर कर्तव्यास अवधी लागत नाही. बारा वर्षाचा काळ सहज निघून गेला. पण पूर्वीच्या काळा इतकी सहनशीलता झेपत नाही व सोसत नाही. या उ:शापाच्या काळामध्ये काय होईल व कशी मानवाची बुद्धी फिरेल सांगू शकत नाही. जशी मानवांची बुद्धी, तशी मनाची भावना कळते. पळण्यास मोकळीक! थोडा काळ पुढे ढकलला आहे. कोणीही वाईट वाटून घ्यायचे नाही, नाराज व्हावयाचे नाही. पहिल्या पासूनची ती भावना आहे. त्रास झालेला आहे, होत आहे. अवधी बाबत वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. का अवधी लागतो आहे, सर्वस्वाची गती आहे. सर्वस्वाचे स्पष्टीकरण करावे कसे?

सत हे केसापेक्षाही अगदी मृदू आहे, लोण्यापेक्षा मृदू आहे. सताची मृदुता केव्हा काय करते याची कल्पना मानवाला नाही. अन ज्या ज्या वेळी अवतार कार्य घेतले त्याची कल्पना चांगल्या तऱ्हेने आहे. अवतार कार्यामध्ये युद्ध करावे लागले होते. मानवी तऱ्हेने कष्ट काढलेले आहेत. भक्तगणांनी प्रमाणाबाहेर त्रास सहन केला. काही कारणास्तव, आजचे उद्या केलेले नाही. कर्तव्य होणार हे निश्चित! ते सांगून होणार असे नाही. अघोर कसे असते, खाऊन पिऊन सुखी असते, चोर सुळसुळीत असतो. चोर व अघोर सुळसुळीत असतात. भक्तीचे तेज नाही व तो फुगलेला असतो. केव्हा वेळ आली म्हणजे फुटून जातो. ©️

You cannot copy content of this page