श्री समर्थ मालिक – मन कुठूनही आले नाही, मन हे माझ्यापासून आहे असे म्हटलेले आहे. मन म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण केलेले आहे. मनाचे आणि तत्त्वाचे बोलणे चालणे ओळखा. म्हणून सेवेकऱ्याने अशा तऱ्हेने वाटचाल करणे. मनाने जरी कोलांट्या उड्या घेतल्या, तरी देह सद्गुरु चरणांजवळ घालणे.
गुरु शिष्याचे प्रेमयुक्त भाषण पाहून मलाही आनंद होत आहे. कारण आज कालचे हे प्रेम नाही. परंपरागत ही जोडी आहे. पण इतकेच, ज्याला ही गती मिळाली त्यालाच ते मिळते. भिन्न प्रकृती अनेक तऱ्हेने वाटचाल करते. अनेक तऱ्हेने बोलते. सत् मार्गाने जाणाऱ्या मानवांनी त्याकडे दुर्लक्ष करणे. सतयुक्त भावनेने सेवेकरी असतील तर सद्गुरु निराकरण करतील.
पंचामृताचे भांडे स्वयं आहे. ज्याला आंबट खाण्याची सवय असते त्यालाच ते मिळते. ही कर्म संचिताप्रमाणे ठेव असते. त्याप्रमाणे प्रकृती ठेवणे भाग असते. पण जो सतभक्त असतो, तो जरी भुकेलेला असला, तरी एक वेळ तरी त्याला पोटभर अन्न द्यावे लागते.
प्रकृतीचे मूळ आधार आहेत. प्रकृतीच्या अंगाने जो जातो, त्याला त्याच तऱ्हेची गती मिळते. सत गतीने जो गेला, तो उत्तम पदाला पावला. ©️
