Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

नामाचा उजाळा केल्यानंतर…©️

नामाचा उजाळा केल्यानंतर…©️

श्री समर्थ मालिक – प्रणव निर्माण कसा होतो? कोठे जातो आणि कोठे लय होतो? प्रणव जो आहे तो अखंड आहे. अखंड अखंडात विलीन होते. प्रणव आकारी पण आहे आणि निराकारी पण आहे. प्रणव जर बंद पडला तर बाकी काय चालते का? तर नाही. मी जो आहे तो नामातच आहे. क्षरातही आहे, अक्षरातही आहे. चरात पण आहे अन् परात पण आहे. मग आणखी काय पाहिजे? मग प्रणव कोठे जातो? कळत नाही.

बोल बोलातून निघत असतो. चैतन्य निर्माण चैतन्यापासून होते. वेदना झाल्या की बोल बाहेर पडायला सुरुवात होते. चंचलता वाढली की बोल बाहेर पडतात. दाबून ठेवले तरी किती दिवस ठेवणार? इतकेच आहे की, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म प्रणव ती म्हणजे हवा.

येथे सर्वच सेवेकरी आहेत असे काही नाही. तत्वाला बांधून घ्यावयाचे ते भक्तीने बांधून घ्यावयाचे असते. भक्तीने बांधून घेतले तर आपोआपच गती मिळते. विचारण्याची सुद्धा गरज नाही.

भक्ती ही सोपी तितकीच कठीण देखील आहे. सेवेकरी म्हणा अगर मानव म्हणा टिचभर पोटासाठी अनेक व्याप करतात. त्यातूनच हे सर्व चाललेले आहे. सेवेकऱ्यांची मनें स्थिर आहेत का? भगवंताला‌ बांधावयाचे असल्यास भक्तीने बांधा. मग सत कोठून प्रगट होते आणि कोठे जाते अन् कोठे लय होते हे समजेल. पण यातूनही जे वेगळे आहे ते सापडणे कठीण आहे. त्यातच लय झाल्यानंतर सांगण्याची आवश्यकता नाही. विचारण्याची ही आवश्यकता नाही. लय झाल्यानंतर सांगता येणार नाही, आहे हे सतच आहे. नामाचा उजाळा केल्यानंतर ज्ञानात आपोआप भर पडते. ज्ञान म्हणजे प्रकाश. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page