Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

धन…..(२) ©️

आपणच आपल्या कृतीप्रमाणे देव व दानव बनतो. दानव काही निराळे नाहीत. दानव म्हणजे अहंकारयुक्त, आचार विचार नाही अशी बुद्धीहीन ज्योत होय.

स्थुलाचे बुद्धी हे भांडवल आहे, पण ती बुद्धी तेजाळलेली पाहिजे, धुरकटलेली, बुरसटलेली नको. तिला सत् शुद्ध विचारांची पावडर मारली पाहिजे. सत् शुद्ध विचारांचे घर्षण झाले तर ती तेजाळलेली राहील.

सगळ्यांचा मदमेरू मन आहे. तेव्हा मनाची भावना नि:ष्काम ठेवली तर बुद्धी पण नि:ष्काम होईल. ज्याला तुम्ही शरण आहात, ते दृश्य आहे. तुम्ही दृश्य आहात. ते दृश्य जर समोर नसेल तर अदृश्य येई़ल कोठून? दृश्यच गतिमान होत असते आणि पांडुरंगाला पाहत असते. याच्या मुळाशी सद्गुरु कृपा आहे. दृश्याच्या ठिकाणी आपण सद्गुरूंची स्थापना करीत असतो. त्यांनी दिलेला नामाचा उजाळा करणे. अशा तऱ्हेने नि:ष्काम गतीने गेले तर सर्वस्व होईल. पण ते स्थूल सत् शुध्द विचाराने गेले पाहिजे. असत विचारांपासून आपण दूर राहिले पाहिजे. अशा विटाळाच्या ज्योती असतात. तेव्हा अदृश्य संपत्तीचा नाश तुमच्याच कृतीने होतो. मग सर्वस्वी नागवला जातो. (२)©️

You cannot copy content of this page