अनेक वेळेला प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा याची ओळख होऊ शकते, पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही.
गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा, किती फरक पडतो याचा सेवेकर्यांनी विचार करा. हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहता म्हणजेच द्वैत भावनेने पाहणे होय. त्या ठिकाणी नाते शोधले जात नाही म्हणून हे उत्पन्न होत असते. मी कोणीतरी आहे अशी भावना निर्माण होते. मग अहंकार, हेवेदावे, अहंपणा निर्माण होतो. ही भावना जोपर्यंत मरत नाही, म्हणजे गटबाजी, कुचेष्टा अन् थोडीशी का होईना अधिकार वाणीने बोलण्याची सवयही असते, म्हणून तत्त्व भिन्न कि प्रकृती भिन्न? ही विचारणा केली.
प्रकृती भिन्न आहे म्हणून हा गोंधळ होत आहे वाढत आहे, मग सेवेकर्यांनी तत्त्वाप्रमाणे चालले पाहिजे की प्रकृतीच्या गतीप्रमाणे चालले पाहिजे? (पुढे सुरू…©️)
