Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

चौकट मुनी (२) ©️

चौकट मुनी (२) ©️

चौकट मुनी – भक्ती करून घेणारे फार निराळे आहेत आणि कशासाठी भक्ती?

जो मानव सत् पाहण्यासाठी तत्पर झाला आहे, तो काहीही होवो, केव्हाही मागे पुढे पाहणार नाही. ज्याची जितकी उत्कंठा झाली असेल, त्याची ती इच्छा सफल होण्यासाठी, त्याला कशाचेही भान रहात नाही आणि ती सफल झाल्यानंतर दुसरीकडे लक्ष देत नाही. मग अशा सत् भक्ताचा, सत् सेवेकऱ्याचा या कृतीत निमग्न झाला, तो कसा होतो? कोणत्या कारणास्तव होतो? इच्छा काहीही असो, माऊली दयाघन असते. त्या ज्योतीची पाहणी केल्यानंतर समर्थ सुद्धा त्याच्यासाठी राबतात. त्याच्या इच्छेचे फळ त्याला देतात. भक्ती करणारे, करून घेणारी माऊलीच होय.

मात्र स्थूल रूपी मानव पूर्णपणे मायेमध्ये गुरफटला आहे. त्याच्यातून सुटणे कठिण होय आणि त्याच्यातून सुटण्याचा जो प्रयत्न करतो, त्याला माऊली संसारात राहू देत नाही. त्यांना सुद्धा हातभार लावते. परंतु, मानवाने, सेवेकऱ्यानें होता होईल तो मायावी वेष्टण दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोपर्यंत मानव हे मायावी जाळे तोडू शकत नाही, मग माऊली म्हणते, असे जर आहे, तर जाऊ दे ! ती जर तळमळीने तोडण्याचा प्रयत्न करील, मग मात्र माऊली गप्प बसणार नाही. ती त्याच्या साठी राबत असते. मात्र सूक्ष्म सेवेकरी व स्थूल सेवेकरी यात पुष्कळ फरक आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page