Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

गोवर्धन ऋषी ©️

गोवर्धन ऋषी ©️

गोवर्धन ऋषी –

जो तेजोमय चैतन्याचा गाभा, तो आज पूर्णत्वाने मिळाला. आतापर्यंतची कृती कर्तव्य, त्याचे फळ प्रत्यक्ष अनुभवायास मिळाले. ध्यानस्थ स्थितीत संकट ओढवले असताना, त्याची यत्किंचितही जाणीव न देता, त्याच स्थितीत ठेवले.

कोणते असे तत्व श्रेष्ठ होते की, त्या तत्वासाठी अहोरात्र टाहो फोडीत होतो, ते मिळाले नाही. परंतु आज प्रत्यक्षात मिळाले.

सद्गुरु नाम आणि ध्यान याच्या निराळे काही नाही. किती अफाट शक्ति आहे की, एवढे भयंकर संकट ओढवले असताना अजिबात जाणीव होऊ दिली नाही. कोणत्या निद्रेत होतो ते कळलं नाही. त्याची जागृती आज पूर्णत्वाने आली, मिळाली.

तेजोमय वलयरुपी चैतन्याचा अखंड लाभ व्हावा, ही आशा आहे. ज्या परब्रह्म शक्तीसाठी आजपर्यंत टाहो फोडला, ते अखंड दर्शन आज मिळाले. हेच अखंड मिळावे ही इच्छा आहे आणि दरबारची सेवा करण्याची इच्छा आहे. ज्या तऱ्हेची सेवा द्याल, त्या तऱ्हेची सेवा करण्याची इच्छा आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page