Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

गुरु ©️

गुरू कोणाला म्हणावे? कसा असावा?

अनेक अनेक (गुरू) होऊन गेलेत. होणार आहेत. मानव ज्योत आपणाला सत् मार्ग, सत् आचरण, सत् बनविण्याच्या मार्गाला आहे. तेच सत् गुरु असे कोण? याच्या शोधाची प्रत्येक सेवेकऱ्याची धडफड आहे.

सत् गुरु कसे?

सत् आचरण, सात्विकता ज्याच्या रोमारोमात भिनली आहे असे ते सत् गुरु होय. ज्याने आपल्या वाणीने बीजारोपण करुन सर्वस्वाचा ठाव घेतला, ते सत् गुरु होय. ते ओळखण्या साठी सत् शिष्य असावा लागतो. तेव्हाच ओळख होते. ओळखण्यासाठी ज्याने ज्ञानाचे बीजारोपण केले, ज्ञान वृक्षाची भरभराट केली, तेच सद्गुरु होय. ते ओळखण्यासाठी सत् वाणी, सत् आचरण अशा तऱ्हेने त्यांच्या जवळ जाण्यासाठी सत् शिष्याची धडपड असते. या धडपडीने जो ऋणानुबंध, तो साधल्यानंतर शिष्याची तृप्ती होते.

सद्गुरूंचा शोध प्रत्येक शिष्याने करावयाचा असतो. नुसत्या ऋणानुबंधाने ठाव घेणे शक्य नाही. आपल्या ठिकाणीं असणाऱ्या अमृततुल्य ठेव्याचा जो उपयोग करतो, त्याला सदगुरू दूर नाहीत. याच्याच योगाने त्यांना पहावयाचे असते. स्व अनुभव हा श्रेष्ठ आहे. सत् वाणीने, सत् वृत्तीने बीजारोपण केल्यानंतर सद्गुरु दूर नाहीत.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page